Skip to main content

Posts

Showing posts from February, 2019

वेड....."अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला."

वेड 11/02/2019 "अरे अभिजीत, खाली ये, जरा बघ देशपांडेकाका आलेत. बराच वेळ झाला." "काय ना! या अभिजीतचं वेड काय विचारू नका. सुट्टी असली ना! की हा असाच तासनतास वरच्या खोलीत जाऊन बसलेला असतो." "किती वाचन करावे म्हणते मी.  वेड लागलय वाचनाचं नुसतं. जे नवीन जुनं पुस्तक मिळेल ते तो वाचतो आणि दोन दोन तीन तीन दिवसात संपून टाकतो." "अहो घारे काकू, असू दे. त्याच्या वाचनाचं आणि एखादा विषय स्पष्ट उलगडून सांगण्याच्या स्टाईल मुळे तर तो कॉलेजमध्ये आम्हा मित्रांमध्ये आणि शिक्षकांमध्ये फेमस आहे" असे कित्येक अभिजीत सध्या कमी होत आहेत. "चांगले बोलू शकतात पण त्यात सकसपणा नाही आणि चांगले लिहू शकतात पण त्यात स्निग्धता नाही" अशी अवस्था आहे. गेल्या दहा बारा वर्षात आणि नव्वदच्या दशकानंतर जन्मलेल्या सर्वच मुला-मुलींच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती लोप पावते आहे.  प्रसिद्ध लेखकांच्या कादंबऱ्या नाटके कथा संग्रह आत्मचरित्र किंवा प्रवासवर्णनांची छोटी छोटी पुस्तकं वगैरे तर सोडाच पण साधा वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाही. एक वेळ अशी होती की भेळपुरी च्या राहिलेल्या कागदावर

आणि सुबोध भावे......"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू

"पारू ग पारू वेसावची पारू" गाण्यावर आमच्या सातवीच्या गॅदरिंग मध्ये डान्स चालू होता. मी जोरात ओरडलो 'जोश्या ही पारू कोण आहे रे स्टेजवर? च्यायला काय दिसतेय यार! शेजारच्या मुलींच्या हुजूरपागा शाळेतून कोणाला बोलावलयं का खास या डान्स साठी.?" "अरे बुध्द् या नाही रे...तो आपल्या वरच्या वर्गातला भावे आहे." सुबोधचा कदाचित रंगमंचावरचा हा तो पहिलाच परफॉर्मन्स असेल. तो त्या पारूच्या वेशात इतका सुंदर दिसत होता की आता खात्री पटते की बालगंधर्व त्याच्याशिवाय दुसरं कोणीच करू शकलं नसतं. अगदी आपले बनवाबनवी वाले महागुरु सुद्धा नाही. पुण्याच्या पेठी वातावरणात आणि एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला आमचा नूमविय सुबोध, आज मराठी रंग-चित्रसृष्टी वर एक हाती राज्य करतोय. आमचा हा आनंद फक्त अस्सल पुणेरी नुमवियंनाच कळू शकतो. तेव्हा नाही पण आता सुबोधला जवळून ओळखणारे पुण्यात अचानकच "खूप" झालेत. एक काळ असा होता की तो भरतच्या बाहेर (भरत नाट्यगृह, पुण्यातील लोकांना भरत म्हंटलं की रामायण नाही आणि मस्तानी म्हंटलं तर बाजीराव नाही...तर सदाशिव पेठ हे कळते. ) टपरीवर

"चिमटा" (काल्पनिक विडंबन)....काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली

काल रात्री पाटबंधारे खात्याची फाइल वाचता वाचता कधी झोप लागली कळालेच नाही. पुढच्या आठवड्यात अधिवेशनात सभागृहात त्या विषयावर चर्चा आहे. त्यामुळे गेला आठवडा पासून त्या ५००-६०० फाइलींचा स्टडी करतोय. अचानक जाग आली तेव्हा चांगलं उजाडलं होतं, फ्रेश होउन बाहेर आलो, बघतो तर सौ. गाण्याच्या रेकॉर्डिंग ला आणि मुलगी शाळेला गेलेली. म्हणजे नक्कीच खूप उशीर झालेला उठायला. नेहमीप्रमाणे आंघोळ पुजा आटपली आणि ब्रेकफास्ट टेबलावर बसलो. आज आवडीचे "तर्री पोहा" होते नाष्ट्याला. खात असतानाच प्रवीण (आमचा पी ए) आला, दिवसभराचे शेड्युल अपडेट करायला. "साहेब, आज ह्या दोन महामंडळाचे कार्यक्रम आहेत, मग ही तीन ठिकाणी उद्घाटने, पक्ष कार्यकर्ते बरोबर बैठक आणि संध्याकाळी पाटील साहेबांकडे पुजेच्या तीर्थ प्रसादाला जायचे आहे." आम्ही अक्षरशः आ वासून बघतच राहिलो त्याच्याकडे, तोंडात पोह्यांचा घास तसाच. प्रवीण घाबरून म्हणाला"साहेब, काय झालं, काही होतयं का?" "अरे, काय झालं, काहीच झालं नाही का? आज एवढेच बाकी काही नाही? कोणता मोर्चा नाही? आंदोलकांबरोबर चर्चा नाही; दूध भाजीपाला वगैरे रस्त्यावर

ओह माय लॉर्ड(स्).......इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोल

इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोलणार..हे साधं आदल्या दिवशी शेंबड्या पोराला सुद्धा कळलं होतं. मग का नाही रात्र भरात काही स्ट्रेटेजी प्लान केली. आणि जर केली तर मग दिसली का नाही. एखादी बैटींग ओर्डर चेंज करुन इंग्लंड च्या बौलरसना गाफिल करता आले असते. एकतर टीम सिलेक्शन करतांना मिडिया चे प्रेशर घेऊन एडिशनल स्पीनर घेतला, बरं पीचचा अंदाज आल्यावर फास्ट बौलरसना जास्तीचा स्पेल देता आला असता. उन्हामुळे आपल्याला तोटा झाला, पण इतका  त्यांनी चारशे पर्यंत जावे आपल्या चौपट. आपण फलंदाजी मधे सारखं विराट विराट कीती करणार, हे म्हणजे अमिताभ चा डबल रोल आहे म्हणून सेटमैक्सच्या सुर्यवंशमला नैशनल आवॉर्ड देण्यासारखे आहे. आमच्या लहानपणी एक फटाका होता चमनचीडी, ती जशी पेटवल्यावर कशीही कुठेही जायची, तसे त्या अंडरसनचे आणि व्होकस्चे बौल घुसत होते आणि आमची कागदी वाघ शिकार होत होते. आपण प्रैक्टिस मैचेस कुठे खेळलो तर आयरलंड मधे, दमट वातावरणात. आणि त्यांच्या जोरावर इंग्लंड मधे डायरेक्ट उतरलो. राज्य नाट्य स्पर्धेसाठी सिरीयल मधे काम करण्याचा प्रकार आहे हा. आयपीएल आणि टिट्वेंट

फादर्स डे निमित्त.. मी...बाबा आणि बाईक (काल्पनिक) ......आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर

आज आकाश च्या बाईक वर बसले आणि आकाश नी गाडी सिंहगड रोडवर सुसाट चालवायला सुरुवात केली. का कुणास ठाउक, अचानक बाबाची आठवण आली. तो सुद्धा रस्ता मोकळा असला की असाच पळवायचा त्याची लाडकी यामहा 100. काय ते प्रेम त्या काळ्या ठेंगण्या ठुसक्या यामहावर. स्वतः च्या मुलीप्रमाणे जपायचा तीला. माझी धाकटी बहीणच जणू. पुण्यात आल्यावर बाबांनी पहिली घेतलेली आणि शेवटपर्यंत तीच वापरली. काळापरत्वे आमच्या कडे दोन टु व्हीलर आणि एक मोठी फोर व्हीलर आली पण बाबाची यामहा कायम चालू कंडिशनमधे.तो वापरायचा आठवड्यात किमान दोन तीन वेळा. मला, रोहीत आणि आईला यामहावर लांब लांब घेऊन जायचं त्याला फार आवडायचं. त्यात त्याला शान वाटायची. कोकणातील नागमोडी वाटा, महाबळेश्वर पसरणी घाट, भर पावसात आम्हाला भिजत फर्स्ट सेकंड टाकत सिंहगडावर नेलेलं अजुनही मनात घट्ट आहे. तो कोणालाही ती वापरायला द्यायचा नाही, मला आठवतंय ते फक्त बाबाचा बेस्ट फ्रेंड सुहास काका कधीतरी चालवायचा. दर रविवारी यामहा स्वच्छ धुवायची, आयलींग ग्रीसींग करायचं. आधी काही वर्ष साध्या आईल नी पुसुन चकाचक करायचा. पुढे मग त्याला बाइक शायनिंग क्रिम मिळाले. त्यांच्या परदेशात

१६ ऑगस्ट २०१८..........."अटलजी गेले". सर्वत्र बातमीचा महापुर, न्युज चैनल प्रथम कारण बिचारी प्रिंट मिडिया दुसऱ्या दिवशी

"अटलजी गेले". सर्वत्र बातमीचा महापुर, न्युज चैनल प्रथम कारण बिचारी प्रिंट मिडिया दुसऱ्या दिवशी. व्हाट्सएप वर, फेसबुकवर, सगळीकडे पब्लिक चं स्टेटस, फोटो, RIP, आदरांजली च्या भावना मुसळधार वाहत होत्या. इतक्या की सध्या केरळ मधे पडणारा पाऊस पण क्षणभर थबकला. अगदी साठ वर्षाच्या आजोबांपासून ते नुकतंच मिसुरडं फुटलेल्या नातवापर्यंत सगळेच हळहळले. खरोखर कालातीतच नेता होते अटलजी. अंतयात्रेला प्रचंड जनसागर ओसंडून पसरला होता अगदी पोलीस एसपीजी कमांडोचा कडेकोट बंदोबस्तात. परंतु त्याचवेळेस सवासौ करोड भारतीयांच्या मनात जो मुक भवसागर उसळला होता तो कोणीच थांबवू शकणारं नव्हतं. तो चिरंतन राहील आणि भविष्यात विविध प्रसंगी तो डोळ्यातून झिरपेलच. काल कश्मीर ते कन्याकुमारी आणि कोलकता ते जामनगर पहिल्यांदाच गदगदलं. स्वातंत्र्योत्तर काळात पक्षांच्या पलिकडे जाणारे जे नेते झाले त्यात अटलजी अव्वल नंबरात होते. त्याच्या वाटेला आलेल्या सत्तेचा विरोधकांनी नेहमी "तेरावा" घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यातल्या अलगद मनाच्या कवीने त्या गोष्टी मनावर न घेता कायमच माणुसकीचा राजधर्म पाळला. एक व्यक्ती

पुण्यात "दिक्षित Diet".......सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची

सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची यथेच्छ चुळ भरली दुकानासमोर. एकदम जोरात सुरुच झाला.. "धक धक करने लगा। ओ मोरा जियारा डरने लगा । संज्या, अन्या छोड ना तू दीक्षित की माधुरी बोल ना..." अरे पक्या काय बे हे नवीन खुळ.. विक्या तु वाचलं का..भावा पुण्यात माधुरी उभी रहणार २०१९ ला... च्यायला विकी हे म्हणजे दुधात रम घालून प्यायलेल्या त्या घाणेकर पेग सारखं रे... एकदम कडडेक... परत कोणी विचारलं तर मानेला झटका दिला आणि म्हटलं "उस्मे क्या है" कि झालं. मला आत्ताच कसं कसं होतं लेका. ती प्रचारासाठी पुण्यात सभा घेणार. प्रभात फेऱ्या सांज फेऱ्या दुपार फेऱ्या मारणार वेगवेगळ्या प्रचारफेऱ्या मारणार. साला जिची एक झलक मिळावी यासाठी आपण कित्येक मुंबई ट्रिप मारल्या. ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर तीच्या पिक्चरच्या गप्पांवर वील्सची पाकिटं संपवली. गुडलकच्या त्या कासिमशेटच्या चहाच्या उधार्या केल्या आणि जिंदगीभर झुरलो ती. ती माधुरी साक्षात आपल्याच शहरात आपल्याला जवळून दिसणार. मानलं भावा आपण ह्या दाढीवाल्या जोडीला. काय खेळी केलीय.. चि

‎नटसम्राट.......ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे..। असं गुणगुणत आपण ह्याच्या प्रेमात पडतोच. असाच

ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे..। असं गुणगुणत आपण ह्याच्या प्रेमात पडतोच. असाच अजब माणूस आहे हा. राकट, रखरखीत, तडक अंगावर येणारा, अचानक भावनिक, दिसायला सर्वसामान्य. तरीपण एकदा का भेटला, बोलला, अनुभव ला का अगदी आपलासा वाटणारा. सच्चा, खरा..जितका पोटात तितकाच ओठात असणारा, भीड न बाळगणारा. शेतकरी कष्टकरी वर्गाची कणव असणारा "नाना". विश्वनाथ (पाळण्यातले नाव) उर्फ नाना पाटेकर. रंगभूमी ची ताकद काय असु शकते ह्याची कलास्रुष्टीत जी काही उत्तुंग उदाहरणं आहेत त्यात एकदम वरच्या नंबरात नानाचा नंबर लागतो. नाटकांच्या बेकस्टेजचे सेट लावणाचे काम करण्यापासून ते अगदी आत्ता Welcome मधल्या मल्लिका शेरावतचा on screen लव्हर कंट्रोल उदय म्हणणारा उदय शेट्टी पर्यंत चा त्याच्या प्रवास एक अलिखित रोमांचक आत्मचरित्रच आहे. विजयाबाईं मेहतांच्या मुशीत आणि समांतर प्रायोगिक रंगभूमीच्या कुशीत रुजलेलं हे खडकावरचं बीज पुढे जाउन इतका मोठा वटवृक्ष होइल, असं कदाचित तेव्हाच्या त्यांच्या समकालीन कलाकारांनाही वाटलं नसेल. सिंहासन मधला तो बेलबोटम पैंट घातलेला किडकिडीत शरीर यष्टीतला चिरकुट स्मगलर आणि फक्त फटके खा

"आम्ही चालवू हा पुढे वारसा" (काल्पनिक विडंबन).........टण टणटण....आश्रमशाळेची संध्याकाळ ची घंटा वाजली. आज दिवाळीच्या सुट्टी च्या

टण टणटण....आश्रमशाळेची संध्याकाळ ची घंटा वाजली. आज दिवाळीच्या सुट्टी च्या आधी चा शेवटचा दिवस. आता पंधरा दिवस सुट्टी. फटाके किल्ला लाडू चिवडा जोरदार धमाल मुलं खुष होती. आश्रमशाळा असल्यामुळे सुट्टी असलीतरी मुलं तिथंच रहात होती. आज मास्तर नेहमीप्रमाणे घोषणा करणार म्हणून सगळ्यांना उत्सुकता होती काय होणार आज. मागच्या वर्षी इरसाल आणि दांडगट असलेल्या "दादानं" कुठंही पाणी मिळालं नाही म्हणून दुसरेच कसलं तरी पाणी किल्ल्यावर शिंपडले अशी अफवा पसरली होती, त्यामुळे मास्तर जाम चिडले होते. त्यांनी वर्गात आल्यावर घोषणा केली कि ह्या वर्षी पहिल्या बाकावर बसणारा, सरळ रेषेत भांग पाडलेला आपला वर्ग मॉनिटर "देवेश" ह्या वर्षी किल्ला करण्याचा मुख्य असेल. झालं दुसर्या दिवशी पासुन देवेश आणि त्याच्या ग्रुपने मग तो जुनाच किल्ला आपल्या पध्दतीने नवनवीन कल्पना लढवत बांधायला सुरवात केली. पण माती तीच आणि तेच दगडही तेच होते. किल्ला अगदी चकाचक तरी दिसत होता. पण एक दिवस दादा आणि देवेश मध्ये चांगलेच शाब्दिक जुंपली. त्याचं झालं असं की दादानी त्या जुन्या किल्ल्यावर छोटा पूल बांधलेला होता त्याला देव

ग्राउंड झीरो........मागच्या वर्षी अमेरिकेत होतो, तेव्हा न्युयार्क शहरातील "ग्राउंड झीरो" ला भेट दिली. एखादी

मागच्या वर्षी अमेरिकेत होतो, तेव्हा न्युयार्क शहरातील "ग्राउंड झीरो" ला भेट दिली. एखादी वास्तु दुर्घटनेत जमीनदोस्त झाल्यावर त्याच वास्तुचं तेवढच अथवा त्याहीपेक्षा भव्यदिव्य स्मारक उभं केलयं. तेही जमीनीवर जमीनीला समांतर. म्हणजे ते ट्वीन टॉवर्स जेवढे उंच असतील तेवढंच आडवं हे स्मारक आहे जणू. ते पाहून वाटतं ह्या विचारांचा पल्ला गाठणं आपल्या देशाला कधी जमणारच नाही बहुतेक. ते एखादी उत्तुंग कमर्शियल इमारत बांधू शकले असते परंतु त्यांनी त्यांची उत्तुंगता , विशालता विचारात दाखवून दिली. काल बर्याच दिवसांनी मुलाला घेउन आमच्या कॉलेजच्या ग्राउंडवर बैट बॉल खेळायला गेलो होतो. आत जिमखान्या पर्यंत गेलो आणि ते द्रुश्य पाहून डोळ्यात पाणीच आले. आमच्या त्या खो खो चे ग्राउंड खणलेले आणि आजुबाजुने ते टिपिकल निळे पत्रे ठोकलेले. त्या सगळ्या जागेवर कसलंतरी नवीन बांधकाम सुरु झालयं असं कळाले. मुलाला समोरच्या बाजुला खेळायला सोडलं आणि मी त्या पत्र्यांच्या समोरच्या कठड्यावर बसलो. झरकन वीस पंचवीस वर्षे फ्लॅशबैक मध्येच गेलो. ते दोन पांढरे खांब, झारीने किंवा बादलीने संपुर्ण ग्राउंडवर मारलेलं पाणी. इतकं

खूब भालो दादा.......त्याची मुलगी मागच्या महिन्यात त्याला म्हणाली "बाबा, तु लॉर्डस वर तेव्हा जर्सी(टी शर्ट) काढून

त्याची मुलगी मागच्या महिन्यात त्याला म्हणाली "बाबा, तु लॉर्डस वर तेव्हा जर्सी(टी शर्ट) काढून फिरवलास ते मला काही आवडलं नाही", "इट्स नॉट इथिकल" वगैरे वगैरे. ह्या नवीन पिढीला काय कळणार त्या जर्सी काढून फिरवण्या मागची भावना. ती दिडशे वर्षे हेटाळलेली आणि तुंबलेली उपेक्षा. इंग्रजांना त्यांच्याच जमीनीवर हरवण्याचा आनंद आणि हो माजपण. तो जिद्दीने ओढून आणलेला विजय, ती यशाची भावना. बस्स आम्ही त्यादिवशी तुझे बेहद्द फैन झालो. जिंकलस भावा, तोडलस मित्रा अश्या शब्द प्रयोगांना चपखल बसेल अशी ती तुझी लॉर्डस वर ची प्रतिक्रिया. अझरउद्दिन नंतर भारतीय क्रिकेट ला एक सातत्याने यश देणारा कैप्टन गवसतच नव्हता. बीसीसीआयचे ट्रायल एंड एरर पध्दत चालूच होती आणि एक दिवस तुझ्यात तो सूर गवसला. अर्थातच हा सूर 'निरागस' नक्कीच नव्हता तर तो 'खर्ज्यातला सा' होता. भारतीय क्रिकेट मधल्या त्या सुवर्ण काळातला तु एक हुकुमाचा एक्का होतास. तुझ्यातली नेतृत्व कसब हि खरंच काही औरच होती. रसगुल्ला सारखा थिबथिबीत गोडीळ नसून चमचमीत चटपटी बंगाली मछली होतास तू. तुझ्या बाबतीत एक किस्सा नेहमी चर्चेला

बालक पालक........"काय गं वैदही, आई काय करतीय?"मी बहीणीच्या घरात पाऊल ठेवताच विचारले. "ती काय आत प्रोजेक्ट

"काय गं वैदही, आई काय करतीय?"मी बहीणीच्या घरात पाऊल ठेवताच विचारले. "ती काय आत प्रोजेक्ट करतीय" वैदूने मोबाईल वर तो टॉकिंग टॉमचा गेम खेळताना मान वर न करताच उत्तर दिले. आतल्या खोलीत जाऊन बघतो तर काय, सायलीताई हे सगळा पसारा मांडून बसलेली फेविकॉल , कलर पेपर, चित्र, कार्डबोर्ड वगैरे वगैरे. म्हणलं काय गं बाई हे? " काही विचारु नकोस अजय, अरे वैदू मैडमची उद्या प्रोजेक्ट सबमिशनची लास्ट डेट आहे शाळेत" प्रोजेक्ट, आजकाल केजी ते पीजी पर्यंतच्या मुलांचा पर्वणीचा शब्द. आमच्या वेळेस हा शब्द इंजिनिअरींग कॉलेजला गेल्यावर ऐकला. मराठी शाळांत पण "प्रोजेक्ट" हाच शब्द वापरतात. "प्रकल्प" असं म्हंटलं तर उगाच भाक्रानांगल, कोयना पासून ते पार एन्रॉन, नाणार अशी नावं डोळ्यासमोर येतात, म्हणून प्रोजेक्टच. मुलं निवांत आणि पालकांनाच टेन्शन. पाल्यांच्या आयांमध्ये तर कॉंपिटिशनच असते ह्या प्रोजेक्टवरुन. "मागच्या वेळी फळभाजी प्रोजेक्ट त्या आर्यन चे सिलेक्ट झालं ना, ती त्याची आई सांगत होती बढाया मारत. तीला काय होतय घरीच असते ती, आमच्या सारखं नाही ऑफिस करून सगळं संभा

शिदोरी...............काय गं ऋचा काय झालं? "आई, मी बाबावर खुप चिडलीय, असा कसा वागू शकतो तो? How he .....

काय गं ऋचा काय झालं? "आई, मी बाबावर खुप चिडलीय, असा कसा वागू शकतो तो? How he dare to touch my phone? माझा मोबाईल चेक करायला लहान का आहे मी आता." असं म्हणत नेहमीप्रमाणे ती आपल्या रुममध्ये जाऊन दार लावून झोपली. आमची ऋचा एकदम पटकन चिडते आणि गेल्या वर्षी कॉलेज ला जायला लागल्यापासून तर जरा जास्तच. चिक्कार मित्रमैत्रिणी, सतत पार्टी, ट्रिप्स, पिक्चर्स चालू असतं. आम्ही पण जास्त डिवचत नाही. कारण अर्थातच बाईसाहेब अभ्यासात हूशार. मुळात बुध्दीमत्ता आहे वडिलांसारखी. त्यामुळे घोकंपट्टी नाही, एकदा का कॉन्सेप्ट समजली की झालं. कायम डिस्टींक्शन असते. तशी शाळेपासून च नीटनेटकी, हुशार, बर्याच वेळा वर्गाची मॉनिटर आणि पहिल्या पाचात होती ऋचा. बारावीमध्ये ९४% होते, पण micro physics मधे रिसर्च करायचा म्हणून BSc ला ऐडमिशन घेतली. अश्या ह्या आमच्या ऋचाबाई. संध्याकाळी अभय ऑफिसमधून आला, नेहमीप्रमाणे चहा खाणं झाल्यावर "अनिता......ऋचा कुठाय गं? का आजपण मैत्रीणीकडे अभ्यासाला हां?"...त्याचा तो नेहमीचा मिश्कील खोडकर स्वर मला जाणवला. मग मीच पुढे होउन म्हंटलं "नाही रे, आत्ताच झोपलीय जरा रूममध्य

आधुनिक काठी..............."बाळ जातो दुरदेशी मन गेले वेडावून आज सकाळपासून" ही कविता आमच्या लहानपणी आई

"बाळ जातो दुरदेशी मन गेले वेडावून आज सकाळपासून" ही कविता आमच्या लहानपणी आई म्हणायची तेव्हा गळा भरुन यायचा आणि दोन तीन वेळा औंढा गिळायचो. बाळं दुरदेशी असलेली आज माझ्या सारखी मंडळी प्रत्येक दुसर्या मध्यमवर्गीय घरात आहेत. आम्ही आई वडील इथंच स्वदेशी सोकॉल्ड आनंदात आहोत. मुलं परदेशी जातांनाचे ते आनंद, अभिमान,काळजी हळूहळू 'पानगळतीसारखी सरु लागते आणि मग एकांतात राह्याण्याचा ग्रीष्म वयोमानानुसार चटका द्यायला सुरवात करतो.' सध्या आधुनिक तंत्रज्ञान आणि सुखसोयी मुळे पुर्वी इतकी तोशीश करावी लागत नाही. घरकामाला पण बर्यापैकी पैशात माणसं मिळतात. या इंटरनेट च्या युगात तर अगदी जवळ बसून बोलतोय, पहातोय असा आभासी अनुभव निर्माण होतो. मुलांपासून आपण एकटे लांब राहतोय अश्या भावना मुखवट्यावर तरी उमटत नाहीत. प्रत्यक्ष चेहर्याचे काय हो, तो चेहरा आपण कधी बघतो का? आयुष्यात मुखवट्यावर तर जगतो आपण, काय बरोबर ना. मी प्रकाश आणि माझी बायको वासंती. आमची पहिली मुलगी मुग्धा पाच वर्षाची झाल्यावरच माझ्या आईची टकळी सुरु झाली. " प्रकाश, आता पुढची तयारी करा रे. घराला दिवा हवा, मुलगा हा आपल्या आडन