Saturday, January 26, 2019

पब्लिक

"ये जो पब्लिक है ये सब जानती है ये जो पब्लिक है"..
हे गाणं ऐकलं की मला नेहमी हिंदी पिक्चर अथवा कोणत्याही हिट फ्लॉप सिनेमाची आठवण येते. हॉलिवूडच्या स्टीवन स्पीलबर्ग पासून ते आत्तापर्यंतच्या नीरज पांडे पर्यंत कोणताही टॅलेंटेड अनुभवी आणि मुरलेला दिग्दर्शक असो, एखाद्या प्रथितयश निर्माता असो, अथवा सुपरस्टार असो, या पब्लिकचं मन असं काही ओळखू शकलेला नाही.
जगाच्या पाठीवर बहुतेक असा कोणीही नसेल जो सिनेमा यायच्या आधी छातीठोकपणे सांगेल की हा पिक्चर सुपर डुपर हिट होईल.
हां ! आता स्वतः स्वतःची फॅन फॉलोइंग फौज तयार करून तीन हजाराच्या वर स्क्रीनवर चित्रपट लावून शंभर-दोनशे करोडची लाल करणारे भाई लोक आहेत. पण ते काही सर्वसमावेशक हिट चित्रपटात गणले जात नाहीत, आणि अहो त्यांनाही ह्या पब्लिकनी "किक" मारलीच आहे की.
तर, या पब्लिकची नस ओळखणे फारच कठीण. ज्या स्पीलबर्गच्या पहिला जुरासिक पार्क ला जगभर लोकांनी डोक्यावर घेतलं त्याचाच पुढचा जुरासिक ची काय अवस्था झाली ते सर्वश्रुत आहे.
आपल्याकडे शोमन राजकपूर ला सुद्धा ज्या "संगम" बद्दल काहीच अपेक्षा नव्हती, तो पार पडदा फाडून सुपर डुपर सिल्वर गोल्डन जुबिली झाला आणि ठोकळा राजेंद्रकुमार रातोरात सुपरस्टार म्हणून गणला गेला. पुढे जाऊन ह्याच राजकपूरनी गाजावाजा करत आणलेला थोड्याफार प्रमाणात त्याचीच आत्मकथा मांडणारा आणि लव्ह, ट्रैजिडी, रोमान्स असं सर्वकाही ठासून भरलेला "मेरा नाम जोकर" अक्षरशः एक दोन आठवड्यातच उतरवावा लागला.
"साला ही पब्लिक काय चीज है।" हे कोणीच सांगू शकत नाही.
क्लासेस आणि मासेस असे दोन वर्ग असलेली हि पब्लिक. हीट चित्रपट मासेस तर पाहतच पण क्लासेस वाले पण तेवढ्याच आवडीने पाहतात तेव्हा खरा तो हिट च्या गणनेत जाऊन पडतो.
मग आपल्याला प्रश्न पडतो की मासेसला किंवा पिटातल्या प्रेक्षकांना आवडणारा "डर्टी पिक्चर" सारखा पिक्चर मासेसला देखील कसा काय आवडतो? अहो हेच तर गुढ रहस्य आहे. एकवेळ बरमुडा ट्रेंगल च रहस्य उलगडेल, त्या मलेशियाच्या MH370 विमानाचं खरं गुढ उकलेल. परंतु "सामना" चित्रपटातल्या "कांबळे चं काय झालं?" सारखं हे हिट पिक्चर चं रहस्य उलगडणार नाही.
"अंदाज अपना अपना" पहिल्या दोन आठवड्यात पडला की काय असं वाटतं आणि अचानक माऊथ पब्लिसिटी मुळे तो इतका चालतो इतका चालतो की ब्लॅक अँड स्टुपिड कॉमेडी च्या पॅटर्न मधला तो एक मैलाचा दगड ठरतो
राजकुमार संतोषी "घायल" आणि "दामिनी" घेऊन येतो आणि सनी देओलचा ढाई किलो चा हात पब्लिक वर जादू करतो. तोच संतोषी तोच सनी देओल "घातक" आणतो आणि हेच पब्लिक त्याला घातक ठरतं. कसं काय बुवा !!
हिंदी मधला मैलाचा दगड ठरलेला असा एकमेव चित्रपट. ज्याच्यावरुन शेकडो कॉपी चित्रपट निघाले आणि ज्याचं नाव घेतलं तरी आत्ताच्या वेबसीरीजच्या जनरेशनमधील यो करणारं टिवरं पोरगं सुद्धा म्हणतं "गब्बर सिंग को कौन नही जानता" वाला "शोले" रमेश सीप्पीला यशाचा एव्हरेस्ट दाखवतो. मग सीप्पी त्याच जोशात "शान" सारखा तगडी मल्टी कास्ट, कडक स्टोरी आणि पॉलिश पिक्चर घेऊन येतो तर तेच पब्लिक अक्षरशः त्याला भुईसपाट करून टाकतं हो।
गुलशन रॉय "त्रिदेव" घेऊन त्रिशतक हिट मारतो पण तसेच त्रिदेव घेऊन तो जेव्हा "विश्वात्मा" आणतो तेव्हा बाराच्या भावात जातो.
आपला मराठीतला आशुतोष गोवारीकर ग्रिक हिरो सारखा दिसणारा रितिक रोशन आणि ऐश्वर्याला घेऊन "जोधा-अकबर" यशस्वी करून दाखवतो आणि मग अजून एक बिग बजेटचा त्याच रितिकचा "मोहोंजोदडो" आणतो तेव्हा मोहोंजोदडो सारखाच तो पिक्चर पण नामशेष करून टाकतय हे पब्लिक.
संजय दत आणि महेश मांजरेकर जोडीचा "वास्तव" हीट होतो. त्याच अपेक्षेवर महेश "अस्तित्व" आणतो आणि काही काळापुरतं त्याचंच अस्तित्वच पब्लिक नष्ट करून टाकते.
"हेरा फेरी" मुळे फॉर्मुला मिळून गेला या नादात प्रियदर्शन सारखा कसलेला दिग्दर्शक आणि कॉमेडीत नवीन विक्रम गाठणारा अक्षय कुमार जेव्हा एकत्र येऊन "खट्टा मिठा" आणतात तेव्हा लोक त्यांना तुम्ही हेराफेरी केलीत म्हणून आम्ही तुमच्या मागे येऊ असं नाही हे दाखवून देतात
बडजात्यांच्या सुरजचा 'हम आपके है कौन" आल्यावर हम आपके है। हे म्हणणारे पब्लिक हम तुम्हारे साथ नही है असं म्हणत "हम साथ साथ है" फुल ऑफ ठरवतात.
अशी समकालीन, मध्यकालीन आणि सुरुवातीच्या काळातली असंख्य उदाहरणं आहेत. कित्येक दिग्दर्शक, निर्माते आणि सुपरस्टार काहीतरी वेगळं नवीन किंवा जे आवडले तेच परत एकदा घेऊन येण्याचा प्रयत्न करतात पण पब्लिकच्या मनात नसेल तर काहीही उपयोग नाही. याची ताजे उदाहरण म्हणजे "झिरो" आणि "ठग्ज ऑफ हिंदुस्तान". त्याचवेळेस आयुषमान खुरानाचा "बढाई हो" १५० कोटीचा गल्ला जमवून हिट होतो.
नक्की हे रसायन काय आहे तेच कळत नाही. काहींना थोडफार कळलं तर त्यांचे चित्रपट फारसे मार खात नाहीत. पण अजूनही तो फॉर्म्युला कोणाला सापडलेला नाही आणि कदाचित सापडणारी नाही.
पब्लिकचा मूड हा बायकां सारखा असतो.. तो कधी बदलेल हे सांगता येत नाही. एखादा रोमॅंटिक चित्रपट हिट झाला म्हणजे पुढचा होईलच असे नाही. जशी यावेळेस लाल रंगाची साडी आवडली म्हणून पुढच्या वेळेस ड्रेस मटेरियल लाल रंगाचंच आवडेल हे सांगता येत नाही तसं.
मला असं वाटतं की त्या त्या काळात पब्लिकला एक रिलॅक्सेशन हव असतं. त्यावेळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती हे ठरवत असते.
बघा नां साधारणतः काय आवडतं
बरं पब्लिकला....तर कथा आपलीशी असावी असं वाटतं, बरं नुसते आपलीशी नाही तर काहीतरी स्वप्नरंजन त्यात असावं. फैंटसी असावी पण इतकी नाही कि ती फारच खोटी वाटेल. कथा खरी असावी असं नाही पण ती खोटी वाटली नाही पाहिजे. हिरो व्हिलन या प्रवृत्ती असाव्यात पण त्या समकालीन वाटाव्यात उगाच "डाबर" आणि "गब्बर" आत्ताच्या चित्रपटात येऊन उपयोग नाही. गाणी असावीत पण त्यांचा भरणा नसावा. आणि कथेच्या अनुषंगानी ती यावीत. उगाच हीरो वडिलांच्या चितेला इथं बंबई मधे अग्नी देतोय आणि दुसर्याच सीन मधे स्वित्झर्लंडमध्ये हिरोइन बरोबर रोमान्सभरं प्रेमगीत गातोय. हे एक्सेप्ट होत नाही हो. हिरो किंवा होरोसारख्या कॅरेक्टर कडे एखादी तरी अशी स्टाईल, लकब असावी की ज्याची कॉपी करता यायला पाहीजे आणि पब्लिक मध्येच करताना भारी वाटलं पाहिजे. असं काहीतरी रसायन आहे की काय असं वाटतं. अर्थात वाटणं आणि असणं यात जमीन-अस्मानाचा फरक असतोच म्हणा.
कारण पब्लिक ला कधी अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन आवडतो तर कधी तद्दन कॉमेडी वाला गोविंदा. बरं हे दोघं एकत्र आले म्हणून "छोटे मिया बडे मिया" हिट होत नाही. कधी मेथॉडिक परफेक्शनिस्ट आमिर तर कधी तद्दन रोमान्स करणारा हिरो आणि विलनपण असणारा शाहरुख. यांना कधी काय आवडेल हे कोणीच सांगू शकत नाही.
कदाचित म्हणूनच चित्रपट सृष्टीतला प्रत्येक जण देवाची करत नसेल एवढी पब्लिकची धूपारती करत असतो.
राजकारणात निवडणुका जिंकून देणारे, त्यात शह काट"शाह" देणारे चाणक्य सापडलेत म्हणे, पण पिक्चर हिट करून देणारे चाणक्य अजून सापडलेले नाहीत.
कदाचित इथे "चाणक्य" नाही तर दुसरा गाल पुढे करणारे "गांधी" असावं लागतं.. म्हणजे चला हा पिक्चर नाही चालला ना तर न चिडता पुढचा पिक्चर त्याच जोमाने काढणारे.
ता. क.
मला दर शुक्रवारी कोणताही नवीन सिनेमा रिलीज झाला की "रंगीला" सिनेमा मधील आमीरचा तो सुपरहिट डायलॉग आठवतो "ए मिली, आपुन पब्लिक है पब्लिक.. किसी को उठा सकता है और किसी को भी गिरा सकता है। जिसमे अपना पैसा वसूल नही उसका डब्बा गुल्ल..."
---मिलिंद सहस्त्रबुद्धे ©

रंगीबेरंगी

२०१८ मधे... सहज सुचलेलं..
रंगीबेरंगी कॉकटेल...🍹🍹
आपण एखाद्याला *द्रुष्टी* 🤓 देऊ शकतो
पण...*द्रुष्टीकोन* 😇 नाही
--
तुम्ही, एकदा का समोरच्या प्रत्येकाला "सर" म्हणायला शिकलात..
की.........."सरसर" वर पोहचतां।
--
एकेकाळी *फोटो* *काढायला* माणूस ठेवायचे..आणि
आता (_mobile मधून_) काढून *टाकायला* ठेवतात...
--
कोकणस्थ कसा ओळखाल....
ज्याच्या हेडफोन कॉर्डचा आणि विचारांचा कधीही गुंता झालेला नसतो..
--
तेव्हा...
आमच्या घरचा *गणपती*
सध्या...
आमचा घरचा *बाप्पा*
--
साम्यवाद, समाजवाद, पुंजीवाद, राष्ट्रवाद
ह्यांच्या पेक्षा *धन्यवाद* अधिक माणुसकी जपतो |
--
सध्या जीला *ट्रोल* करण्याची हिंमत कोणात नाही अशी बहुमुल्य गोष्ट म्हणजे
*पेट्रोल*
--
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात
आपण ठरवायचं की आपल्या *छाप्याची* सिंहांची बाजू बघायची आहे
का?
*काट्याची* बघून ते पंचवीस पैशाचं का बंदा रुपाया ह्याची चिंता करायची आहे
--
मी सच्चा सैनिक आहे आणि फक्त *मातोश्री* चे आदेश मानतो
बायको म्हणते *You are Moma's Boy*
--
*जळणे* हा गुणधर्म तसा वाईट नाही।
फरक इतकाच की *जळून...*
उदबत्ती सारखं .. *दरवळताय*।
का
लाकडा सारखं..*कोळसा* करताय।
--
*सम* आकड्या सारखं जगावं..
मग..
कीतीही मोठ्या *विषम* संख्येबरोबर गुणलं तरी
आयुष्यातील उत्तरं *सम* च येतात।
--
भावना आणि रंग दोन्हीमध्ये साम्य विविधतेचं असतं..
तुम्ही कसं मांडताय त्यावर दारासमोर किंवा जीवनात रांगोळी तयार होते...
--
एक प्रवास असतो प्रत्येकाचा, प्रवास जेव्हा धेय्य बनतं तेव्हा त्याची सफर होते, सफरीचा जेव्हा आनंद घ्यायला सुरवात होते तेव्हा यशाच्या पायर्या चढायला सुरवात होते...आणि मग काय, प्रत्येक पायरी गणिक नवीन किर्तीमान प्रस्थापित होतात...
--
"वर"..."चष्मा" काढून ठेवाल तर सगळं स्पष्ट दिसेल
--
शेवटी निघतांना जेव्हा काही micoseconds क्षणांत जी नजरानजर होते,
त्यात पुढच्या भेटीची आश्वासकता असते...😊
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏
--बुध्दे महाराज की जय।
....©मिलिंद सहस्त्रबुद्धे

SELF MADE MAN

SELF MADE MAN
The Person who proved this Statement 100% true.
Re sharing my BDay wishes...
"रूस्तम" अक्षयकुमार
जेव्हा सच्चा Superstar actor चा पिक्चर येतो, तेव्हा....
१. "उडता" उडता फिल्म प्रदशर्शना आधी लीक झाली म्हणून बोंब होत नाही
२. कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून आंदोलने होत नाहीत
३. भाई भैय्या सारखी कोटीच्या कोटी उड्डाणाची तद्दन चर्चा होत नाही
४. आणि हो प्रत्येक वेळी लग्न ठरलेल्या हिरोइन बरोबर 'दिलवाले' म्हणत बादशागिरी नाही
५. उगाच protin वाली body building ची हवा नाही...Original body देसी..
६. 'जोहर' आणि 'चोप्रा' सारख्या hi fi बैनर ची लेबलं नाहीत
७. कपूर, बच्चन, रोशन सारखी पुण्याइ पाठीशी नाही
तरीही माझ्यासारख्या असंख्य 'अक्षय' रसिकांना खात्री असते ती पिक्चर हिट होण्याची....कारण..
"ना हम अमिताभ, ना दीलीपकुमार, ना किसी हिरो के बच्चे...हम है सीधे साधे अक्षय अक्षय"
© Milind Sahasrabudhe.

काही मनातल्या आरोळ्या

जश्या कवितेत चारोळ्या
तश्या ह्या काही मनातल्या आरोळ्या..
१।।
वहिवाटेवरचे खडे बोचत असतात 
हळूहळू त्याचीच चटक लागते
वळणावर मी एखादी नवी वाट शोधतो, काही बोचलं नाही, तर चुकलो की काय? वाटावे, इतकी चटक...
२।।
आनंदाश्रू वाहत असतात डोळ्यातून ओघळतात गालावरून
विचित्र वाटते अचानक
कारण, जीभेला त्या खार्या पाण्याचीच चव माहीत असते
३।।
गर्दी मध्ये उत्साह आपल्या नावाचाच गजर
सर्वच जण आपल्याकडे बघतायत...
मला मात्र मुखवटे मागचे चेहरेच दिसत राहतात आणि आपसुकच पोकळ सुहास्य माझ्या चेहर्यावर मुखवटा चढवतं..
---मिलिंद सं$बुध्दे

ने मजसी ने

ने मजसी ने....।सागरा प्राण तळमळला....
तळमळला प्राण ऐकूनी तुमच्या
आयुष्याची ज्ञाती
बारा हजार प्रुष्ठांचे साहित्य लिहणारा एकमेव नेता अशी ख्याती।
करून मुलाचा अंत्यसंस्कार चौथ्या वर्षी होईल का कोणाचे मन हर्षी,
बैरीस्टर होवूनी ही तीसाव्या वर्षी ।
सत्तावीस वर्षे तुरुंगातली, जणू सत्तावीस नक्षत्रे हिंदू साहित्या मधली
अखंड तळपत होता सरस्वतीचा सुर्य
अंदमानाच्या क्षितिजावरती ।
हिंदू म्हणवुन घेणारे आम्ही, नाही कळला आम्हास तयाचा अर्थ
"हिंदुत्व" लिहून तुम्ही दाखविलात माणुस धर्मातला परमार्थ ।
कालातीत होतात तुम्ही, वदलात तेहतीस कोटी देव नव्हे, तर गाय हा पशु उपयुक्त
सर्वजनांच्या उध्दारा करीता पतितपावन बांधणारे द्रष्टे, तुम्ही जानव्याचे भक्त।
ब्रिटिशांनी अजूनही जपले, तुमची वास्तु आणि ग्रंथ कार्य
हळहळून म्हणती,
आमच्या देशी का जन्माला नाही
हा तेजोमय आर्य ।
---मिलिंद सबुध्दे
२६ फेब्रुवारी - स्वातंत्र्यवीर विदा सावरकर पुण्यतिथी निमित्त, माझे विनम्र अभिवादन।

मराठी भाषा दिनानिमित्त!

आद्य हि भाषा, संस्कृत जीची जननी
हिंदी, अरबी, पाली जीच्या भगीनी
अटकेपार जीचा झेंडा रोवूनी
पालक मरहाटा, आला जग जिंकोनी
तीच्यात बाळातल्या *ळ* चा गोडवा
तर बाणातल्या *ण* चा धारवा
तीची अक्षरे मुळ बारा आणि
बाराखडीत मांडलेला जगपसारा हा सारा
अलंकार, उपहास, समास अश्या विविध तीच्या छटा
जणू सौंदर्यवतीच्या चेहर्यावर घरंगळणार्या लोभस बटा
तीच्या सामर्थ्याची काय सांगू मी कहाणी
उलगडली भगवतगीता तीच्यातून संतांनी
शुद्ध अशुद्ध अशी जीची समतोल बांधणी
ओठी वसे ती, शिक्षीत असो वा अडाणी
अशी ही आमची माय मराठी भाषा
धमन्यात धावती तीच्या अभिमानाच्या रेषा
---मिलिंद सबुध्दे

"चिमणी दिन" निमित्त....

कुठे आहात गड्यांनो, शोधतोय मी तुम्हाला
तुमचं नेसर्गिक रंग रुप आणि भाबडेपणा
दाखवायचा आहे माझ्या मुलाला
बालपणी माझ्या,
होतात तुम्ही रस्त्यावर, झाडांवर आणि अंगणात
गोष्टी ऐकतांना तुमच्या, पाहायचो मी तुम्हालाच फक्त स्वप्नात
पावसाळ्यात,
भिजलेल्या पंखांनी शॉवर तुम्ही करायचात
कुठल्यातरी छप्पराखाली
काट्याकुट्यांच्या घरट्यात आनंदाने राहायचात
गुडुप झालात माझ्या खिडकीच्या नभातून
यारे या, परत यारे सारे,
दाखवायची आहेत मला
चिउ-काउ, राघू-मैना आणि फुलपाखरे
नवीन वर्षी केलाय संकल्प,
झाडे लावीन सर्वत्र अनेक
ज्यावर बांधाल तुम्ही छोटं घरटं एक
बहरेल तुमचा संसार तिथे
रोज दिवसागणिक
मुलाला नाही भेटलात तरी चालेल
पण वाढवा माझ्या नातवाशी जवळीक।
@ मिलिंद संबुध्दे

नव्वदीच्या Dolby वाल्या म्हणी आणि आम्ही...

"हार कर जीतने वाले को बाजीगर कहैते है"। हया एका वाक्यामुळे आमच्या सारखे average 70% वाले सुध्दा स्वतःला extra ordinary समजू लागले..Thanks SRK
"Friendship मै नो sorry नो thank you" 
हे वाक्य धतींग करत म्हणता यावे म्हणून college canteen मध्ये चहा वडापाव पार्ट्या देउन, उधार्या झाल्या आमच्या..
पण आमचे भाग्य(श्री) कधीच उजळले नाही...
"जुते दे दो पैसे ले लो"....
ह्या गाण्यानंतर तर उगाच सगळ्याच लग्नात बूट लपवण्याचा shot सुरु झाला....आणि हम आप के है कौन म्हणत..आमच्या सारख्या मी मराठी वाल्यांनी जीजू शब्दाचे चींगम केले..
"मर गया राहुल".....
आमच्या college canteen मधे मग सचिन, सतीश, विकास वगैरे सगळेच राहुल.. गांधी नोट खर्च करु लागले...
खरंच आता वाटतयं वय तर पागल है।
"बडे बडे शहरो मै छोटी छोटी बाते होती रहती है"....
Engineering second year M3 down, मग काय आपण टाकला हा डायलॉग ताईसमोर, बाबांनी मागून येउन जोरात मारलेली टप्पल अजून याद आती है।
नंतर बर्याच वर्षांनी RRआबांना पण अनुभव आला.. पत्रकार खुर्ची ले जाएंगे...
१४ फेब्रुवारी आणि पोर्णिमा एकाच दिवशी आले कि तो आमच्या सारख्या friendship to loveship वाल्यांसाठी साडेतीन मुहूर्त पैकी ऐक असतो म्हणे......
Thanks YRF
नवीन लग्न झालेल्या शेजारच्या मराठी काकू अचानक "करवा चौथ" साठी तुळशी बागेतून खास चाळण घेउन आल्या...
त्या दिवशी काकांना हम दिल दे चुके मधला सलमान झाल्या सारखे वाटलं..
असो..
पण खरंच DDLJ मधल्या अमरीश पुरींच्या खर्ज्या आवाजतल्या "जा सिम्रन जा.. जी ले अपनी जिंदगी" सारखे आम्ही त्याकाळी स्वप्नवत मनमुराद जगलो
Thanks Bollywood
---मिलिंद स$बुध्दे

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प...