Skip to main content

"आम्ही चालवू हा पुढे वारसा" (काल्पनिक विडंबन).........टण टणटण....आश्रमशाळेची संध्याकाळ ची घंटा वाजली. आज दिवाळीच्या सुट्टी च्या

टण टणटण....आश्रमशाळेची संध्याकाळ ची घंटा वाजली. आज दिवाळीच्या सुट्टी च्या आधी चा शेवटचा दिवस. आता पंधरा दिवस सुट्टी. फटाके किल्ला लाडू चिवडा जोरदार धमाल मुलं खुष होती. आश्रमशाळा असल्यामुळे सुट्टी असलीतरी मुलं तिथंच रहात होती. आज मास्तर नेहमीप्रमाणे घोषणा करणार म्हणून सगळ्यांना उत्सुकता होती काय होणार आज.
मागच्या वर्षी इरसाल आणि दांडगट असलेल्या "दादानं" कुठंही पाणी मिळालं नाही म्हणून दुसरेच कसलं तरी पाणी किल्ल्यावर शिंपडले अशी अफवा पसरली होती, त्यामुळे मास्तर जाम चिडले होते. त्यांनी वर्गात आल्यावर घोषणा केली कि ह्या वर्षी पहिल्या बाकावर बसणारा, सरळ रेषेत भांग पाडलेला आपला वर्ग मॉनिटर "देवेश" ह्या वर्षी किल्ला करण्याचा मुख्य असेल.
झालं दुसर्या दिवशी पासुन देवेश आणि त्याच्या ग्रुपने मग तो जुनाच किल्ला आपल्या पध्दतीने नवनवीन कल्पना लढवत बांधायला सुरवात केली. पण माती तीच आणि तेच दगडही तेच होते. किल्ला अगदी चकाचक तरी दिसत होता.
पण एक दिवस दादा आणि देवेश मध्ये चांगलेच शाब्दिक जुंपली. त्याचं झालं असं की दादानी त्या जुन्या किल्ल्यावर
छोटा पूल बांधलेला होता त्याला देवेश नी आपणच तो पूर्ण केला असं म्हटल्यावर दादाची जोरदार सटकली..
दादा: त्याच्या नेहमीच्या कपाळावर आठ्या आणून..देवेश हे बरोबर नाय या ठिकाणी तुम्ही लोकांनी जो चमकोगिरी चा घाट घातला आहे तो तुम्हाला शाळा परत सुरू झाल्यावर चांगलाच नडंल.
देवेश: आम्ही शब्द दिला होता की चकाचक किल्ला बांधू आणि आम्ही तो पूर्ण करत आहोत. या किल्ल्याला मी दत्तक घेतलंय आणि आम्हीच आता किल्लेदार
दादा: अरे काय चकाचक, साल्या हो आम्ही डांबराचे रस्ते बांधून काळा पैसा पचवला तुम्ही बी तेच करताय की सगळीकडे सिमेंटचे रस्ते आणि स्मार्ट किल्ला नावाखाली हे भले मोठे सिमेंटचे फूटपाथ बांधून तुम्ही तर पांढरा पैसा बी पचवताय. आमच्या शेजारच्या खोलीतील सुरेश नी मागच्या वर्षी इथं या किल्ल्याच्या रस्त्याच्या मध्यभागी बस चालवून दाखवली होती तर तुम्ही बोलले हा मास्तरांनी दिलेला पैसा चोरतो आणि या बसमुळे किल्ला विद्रूप दिसतोय
तुम्ही तर कुरघोडीत केली जमिनीवर तर खातातच आहात आता नव्या स्टाईलची काय तर म्हणे मेट्रो रेल ची प्रतिकृती उभी करून दाखवतो म्हणून हवेत बी खाता..कसं रे गड्या कसं व्हायचं
देवेश : तुम्ही काहीही म्हणा आम्ही वेगवेगळ्या कल्पना मांडून किल्ला नव्या रूपात निर्माण करतोय. आम्ही नवीन कल्पना आणलीय नारळाच्या करवंटी त्याच्या वाट्या वापरून आम्ही जलयुक्त विहिरी बनवल्यात किल्ल्यावर आणि आजूबाजूला. तुम्हाला साधे पाणी पण वापरता आलं नाही मागच्या वर्षी आणि शेवटी करंगळीवरचं वापरण्याची भाषा तुमची.
दादा: बरोबर ना पण या नारळाच्या करवंट्याची खालची भोक तुम्ही बुजवले नाही जाणून बुजून. पाणी कुठं जातयं ते कळतय हळूहळू सगळ्यांना आता.
तेवढ्यात तिसऱ्या बेंचवर बसणारा राम आला. रामची खासियत म्हणजे रामदासांचे जसे दोन चार ओळीत मनाचे श्लोक असतात तसा हा राम्या दोन दोन ओळी च्या कविता अगदी झटपट करतो. तो डबा खायला आला की मुलं पळून जातात त्याच्यापासून. नेहमीप्रमाणे तोंड मधेच घालत कविता केलीच त्यांनी
"देवेशने बनवला समृद्धीचा किल्ला आणि भरवली जत्रा।
दादा गैंगची फसली बोल हल्ला यात्रा ।"
दादा : (चिडून म्हणाला) ए राम्या मागच्या वर्षी आमच्या बरोबर होता ना रे तू आता तिकडे गेला का किती वेळा थुंकी इकडची तिकडे करशील..सुकली ना तर कुठे जाता येणार नाही
हे सगळं चालू असताना शाळेचा फेवरेट चष्मिस फोटोग्राफर आणि त्याची दांडगट टीम देवेश बरोबर वरून किल्ल्याचे फोटो काढत होती. त्यांना त्या फोटोंचं प्रदर्शन नाताळच्या सुट्टीत शाळेत भरवायचं होते. पण फोटो काढून झाल्यावर त्यांचे पण काहीतरी बिनसले. त्यांनी आणलेलं वाघाचे चित्र खालच्या गुहेत ठेवलं होतं. ते पाहून संतापले ते मग म्हणायला लागले आमचा वाघ ह्या गुहेत येवढ्या खाली शक्यच नाही त्याला डायरेक्ट वर सिंहासनाच्या शेजारी ठेवा नाहीतर आम्ही किल्लाच पाडून टाकतो आत्ताच्या आत्ता.
त्यांच्या म्होरक्या चष्मिस दादूला काहीच कळत नव्हतं एकदा त्याला वाटत होतं पाडून टाकू किल्ला जर आपल्या वाघाला वर नाही ठेवला तर आणि एकदा वाटत होतं च्यायला किल्ला पाडला तर कोणत्या किल्ल्याचे फोटो काढले ते प्रदर्शनात कसं सांगणार. त्यामुळे ती गॅंग नुसतीच जोरजोरात ओरडत होती किल्ला पाडू किल्ला पाडू.
देवेश मात्र स्तब्ध आणि शांत होता आपल्याच चप्प भागावर हात फिरवत. त्याला या किल्ल्या पाडूच्या सर्व किल्ल्या माहिती होत्या
दादा: या ठिकाणी आमच्या खोलीतली काही पोरं तुम्ही किल्ला करायला दिल्यामुळे तुमच्यात आली आहेत पण ध्यानात ठेवा ती पोरं लई बेनी आहेत कधी तुमच्या किल्ल्याला आतून फटाका लावतील सांगता येणार नाही
देवेश: आम्ही एक पारदर्शी पद्धतीने तुमच्या समोर किल्ला बनवला आहे आता तो कसा बनवला कुठल्या मातीचा ती माती कुठून आणली ते दगड कोणाचे ते मात्र विचारू नका
ही भांडणं जरा जास्तच विकोपाला जात आहेत असं जाणवल्यावर देवेश नी दादाला जरा बौद्धिक दिलं आणि म्हणाला "हे बघ दादा, कसं ए, गेली कित्येक वर्ष तुम्ही किल्ला बांधत आहे आम्हाला याच वर्षी किल्ला बांधायचा चान्स मिळालाय. बांधु दे आम्हाला आमच्या पद्धतीने आम्हाला पण घेऊ दे ना मजा मास्तर एवढे पैसे देतात त्याची.
शेवटी कसा आहे दादा, हा तुमच्याकडूनच आलेला वारसा आहे तो आम्ही पुढे चालवणारच की. शेवटी आपल्या सर्वांचे *गुरु साहेब* एकच, त्याचंच तर बोट धरुन आमचे सीनिअरस आणि आम्ही ह्या शाळेत आलो. आपल्याला मिळालेला हा वारसा कोणी कशा पद्धतीने चालवायचा त्याचं तो ठरवेल. आणि हो नाराज होऊ नका मास्तरांनी विचारलंच तर मग आम्ही सांगू की, ते मागच्या वर्षी जे पाणी शिंपडलं होतं, ते गोमूत्र होतं म्हणून! काय बरोबर की नाही" मग सर्वत्र हास्याचा गडगडाट झाला.
दुसरे दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मुलं चार रांगा करून उभी होती आणि आश्रम शाळेची प्रार्थना सुरू झाली
"गुरुने दिला दानरुपी (₹) वसा...
आम्ही(पण) चालवू हा पुढे वारसा..."
----मिलिंद सहस्रबुद्धे ©

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि