Skip to main content

"आम्ही चालवू हा पुढे वारसा" (काल्पनिक विडंबन).........टण टणटण....आश्रमशाळेची संध्याकाळ ची घंटा वाजली. आज दिवाळीच्या सुट्टी च्या

टण टणटण....आश्रमशाळेची संध्याकाळ ची घंटा वाजली. आज दिवाळीच्या सुट्टी च्या आधी चा शेवटचा दिवस. आता पंधरा दिवस सुट्टी. फटाके किल्ला लाडू चिवडा जोरदार धमाल मुलं खुष होती. आश्रमशाळा असल्यामुळे सुट्टी असलीतरी मुलं तिथंच रहात होती. आज मास्तर नेहमीप्रमाणे घोषणा करणार म्हणून सगळ्यांना उत्सुकता होती काय होणार आज.
मागच्या वर्षी इरसाल आणि दांडगट असलेल्या "दादानं" कुठंही पाणी मिळालं नाही म्हणून दुसरेच कसलं तरी पाणी किल्ल्यावर शिंपडले अशी अफवा पसरली होती, त्यामुळे मास्तर जाम चिडले होते. त्यांनी वर्गात आल्यावर घोषणा केली कि ह्या वर्षी पहिल्या बाकावर बसणारा, सरळ रेषेत भांग पाडलेला आपला वर्ग मॉनिटर "देवेश" ह्या वर्षी किल्ला करण्याचा मुख्य असेल.
झालं दुसर्या दिवशी पासुन देवेश आणि त्याच्या ग्रुपने मग तो जुनाच किल्ला आपल्या पध्दतीने नवनवीन कल्पना लढवत बांधायला सुरवात केली. पण माती तीच आणि तेच दगडही तेच होते. किल्ला अगदी चकाचक तरी दिसत होता.
पण एक दिवस दादा आणि देवेश मध्ये चांगलेच शाब्दिक जुंपली. त्याचं झालं असं की दादानी त्या जुन्या किल्ल्यावर
छोटा पूल बांधलेला होता त्याला देवेश नी आपणच तो पूर्ण केला असं म्हटल्यावर दादाची जोरदार सटकली..
दादा: त्याच्या नेहमीच्या कपाळावर आठ्या आणून..देवेश हे बरोबर नाय या ठिकाणी तुम्ही लोकांनी जो चमकोगिरी चा घाट घातला आहे तो तुम्हाला शाळा परत सुरू झाल्यावर चांगलाच नडंल.
देवेश: आम्ही शब्द दिला होता की चकाचक किल्ला बांधू आणि आम्ही तो पूर्ण करत आहोत. या किल्ल्याला मी दत्तक घेतलंय आणि आम्हीच आता किल्लेदार
दादा: अरे काय चकाचक, साल्या हो आम्ही डांबराचे रस्ते बांधून काळा पैसा पचवला तुम्ही बी तेच करताय की सगळीकडे सिमेंटचे रस्ते आणि स्मार्ट किल्ला नावाखाली हे भले मोठे सिमेंटचे फूटपाथ बांधून तुम्ही तर पांढरा पैसा बी पचवताय. आमच्या शेजारच्या खोलीतील सुरेश नी मागच्या वर्षी इथं या किल्ल्याच्या रस्त्याच्या मध्यभागी बस चालवून दाखवली होती तर तुम्ही बोलले हा मास्तरांनी दिलेला पैसा चोरतो आणि या बसमुळे किल्ला विद्रूप दिसतोय
तुम्ही तर कुरघोडीत केली जमिनीवर तर खातातच आहात आता नव्या स्टाईलची काय तर म्हणे मेट्रो रेल ची प्रतिकृती उभी करून दाखवतो म्हणून हवेत बी खाता..कसं रे गड्या कसं व्हायचं
देवेश : तुम्ही काहीही म्हणा आम्ही वेगवेगळ्या कल्पना मांडून किल्ला नव्या रूपात निर्माण करतोय. आम्ही नवीन कल्पना आणलीय नारळाच्या करवंटी त्याच्या वाट्या वापरून आम्ही जलयुक्त विहिरी बनवल्यात किल्ल्यावर आणि आजूबाजूला. तुम्हाला साधे पाणी पण वापरता आलं नाही मागच्या वर्षी आणि शेवटी करंगळीवरचं वापरण्याची भाषा तुमची.
दादा: बरोबर ना पण या नारळाच्या करवंट्याची खालची भोक तुम्ही बुजवले नाही जाणून बुजून. पाणी कुठं जातयं ते कळतय हळूहळू सगळ्यांना आता.
तेवढ्यात तिसऱ्या बेंचवर बसणारा राम आला. रामची खासियत म्हणजे रामदासांचे जसे दोन चार ओळीत मनाचे श्लोक असतात तसा हा राम्या दोन दोन ओळी च्या कविता अगदी झटपट करतो. तो डबा खायला आला की मुलं पळून जातात त्याच्यापासून. नेहमीप्रमाणे तोंड मधेच घालत कविता केलीच त्यांनी
"देवेशने बनवला समृद्धीचा किल्ला आणि भरवली जत्रा।
दादा गैंगची फसली बोल हल्ला यात्रा ।"
दादा : (चिडून म्हणाला) ए राम्या मागच्या वर्षी आमच्या बरोबर होता ना रे तू आता तिकडे गेला का किती वेळा थुंकी इकडची तिकडे करशील..सुकली ना तर कुठे जाता येणार नाही
हे सगळं चालू असताना शाळेचा फेवरेट चष्मिस फोटोग्राफर आणि त्याची दांडगट टीम देवेश बरोबर वरून किल्ल्याचे फोटो काढत होती. त्यांना त्या फोटोंचं प्रदर्शन नाताळच्या सुट्टीत शाळेत भरवायचं होते. पण फोटो काढून झाल्यावर त्यांचे पण काहीतरी बिनसले. त्यांनी आणलेलं वाघाचे चित्र खालच्या गुहेत ठेवलं होतं. ते पाहून संतापले ते मग म्हणायला लागले आमचा वाघ ह्या गुहेत येवढ्या खाली शक्यच नाही त्याला डायरेक्ट वर सिंहासनाच्या शेजारी ठेवा नाहीतर आम्ही किल्लाच पाडून टाकतो आत्ताच्या आत्ता.
त्यांच्या म्होरक्या चष्मिस दादूला काहीच कळत नव्हतं एकदा त्याला वाटत होतं पाडून टाकू किल्ला जर आपल्या वाघाला वर नाही ठेवला तर आणि एकदा वाटत होतं च्यायला किल्ला पाडला तर कोणत्या किल्ल्याचे फोटो काढले ते प्रदर्शनात कसं सांगणार. त्यामुळे ती गॅंग नुसतीच जोरजोरात ओरडत होती किल्ला पाडू किल्ला पाडू.
देवेश मात्र स्तब्ध आणि शांत होता आपल्याच चप्प भागावर हात फिरवत. त्याला या किल्ल्या पाडूच्या सर्व किल्ल्या माहिती होत्या
दादा: या ठिकाणी आमच्या खोलीतली काही पोरं तुम्ही किल्ला करायला दिल्यामुळे तुमच्यात आली आहेत पण ध्यानात ठेवा ती पोरं लई बेनी आहेत कधी तुमच्या किल्ल्याला आतून फटाका लावतील सांगता येणार नाही
देवेश: आम्ही एक पारदर्शी पद्धतीने तुमच्या समोर किल्ला बनवला आहे आता तो कसा बनवला कुठल्या मातीचा ती माती कुठून आणली ते दगड कोणाचे ते मात्र विचारू नका
ही भांडणं जरा जास्तच विकोपाला जात आहेत असं जाणवल्यावर देवेश नी दादाला जरा बौद्धिक दिलं आणि म्हणाला "हे बघ दादा, कसं ए, गेली कित्येक वर्ष तुम्ही किल्ला बांधत आहे आम्हाला याच वर्षी किल्ला बांधायचा चान्स मिळालाय. बांधु दे आम्हाला आमच्या पद्धतीने आम्हाला पण घेऊ दे ना मजा मास्तर एवढे पैसे देतात त्याची.
शेवटी कसा आहे दादा, हा तुमच्याकडूनच आलेला वारसा आहे तो आम्ही पुढे चालवणारच की. शेवटी आपल्या सर्वांचे *गुरु साहेब* एकच, त्याचंच तर बोट धरुन आमचे सीनिअरस आणि आम्ही ह्या शाळेत आलो. आपल्याला मिळालेला हा वारसा कोणी कशा पद्धतीने चालवायचा त्याचं तो ठरवेल. आणि हो नाराज होऊ नका मास्तरांनी विचारलंच तर मग आम्ही सांगू की, ते मागच्या वर्षी जे पाणी शिंपडलं होतं, ते गोमूत्र होतं म्हणून! काय बरोबर की नाही" मग सर्वत्र हास्याचा गडगडाट झाला.
दुसरे दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मुलं चार रांगा करून उभी होती आणि आश्रम शाळेची प्रार्थना सुरू झाली
"गुरुने दिला दानरुपी (₹) वसा...
आम्ही(पण) चालवू हा पुढे वारसा..."
----मिलिंद सहस्रबुद्धे ©

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...