Skip to main content

१६ ऑगस्ट २०१८..........."अटलजी गेले". सर्वत्र बातमीचा महापुर, न्युज चैनल प्रथम कारण बिचारी प्रिंट मिडिया दुसऱ्या दिवशी

"अटलजी गेले". सर्वत्र बातमीचा महापुर, न्युज चैनल प्रथम कारण बिचारी प्रिंट मिडिया दुसऱ्या दिवशी. व्हाट्सएप वर, फेसबुकवर, सगळीकडे पब्लिक चं स्टेटस, फोटो, RIP, आदरांजली च्या भावना मुसळधार वाहत होत्या. इतक्या की सध्या केरळ मधे पडणारा पाऊस पण क्षणभर थबकला. अगदी साठ वर्षाच्या आजोबांपासून ते नुकतंच मिसुरडं फुटलेल्या नातवापर्यंत सगळेच हळहळले. खरोखर कालातीतच नेता होते अटलजी.
अंतयात्रेला प्रचंड जनसागर ओसंडून पसरला होता अगदी पोलीस एसपीजी कमांडोचा कडेकोट बंदोबस्तात. परंतु त्याचवेळेस सवासौ करोड भारतीयांच्या मनात जो मुक भवसागर उसळला होता तो कोणीच थांबवू शकणारं नव्हतं. तो चिरंतन राहील आणि भविष्यात विविध प्रसंगी तो डोळ्यातून झिरपेलच. काल कश्मीर ते कन्याकुमारी आणि कोलकता ते जामनगर पहिल्यांदाच गदगदलं.
स्वातंत्र्योत्तर काळात पक्षांच्या पलिकडे जाणारे जे नेते झाले त्यात अटलजी अव्वल नंबरात होते. त्याच्या वाटेला आलेल्या सत्तेचा विरोधकांनी नेहमी "तेरावा" घालण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यातल्या अलगद मनाच्या कवीने त्या गोष्टी मनावर न घेता कायमच माणुसकीचा राजधर्म पाळला.
एक व्यक्ती अनेक पैलू, कोहिनूरला सुद्धा एवढे नसतील इतके. संघर्षातून सत्तेकडे हे वाक्य तंतोतंत जगणारे अटलजी.
साधारण ९२-९४ साली कॉलेज वयात अटलजी टिव्ही च्या माध्यमातून अधिक समजू लागले. लोकसभा राज्यसभा चे डिडि चैनल्स ह्यावरुन ऐकायला बघायला मिळू लागले. प्रमोद महाजन, बाळासाहेब अश्या राज्यातल्या आमोघ राजकारणी वक्त्यांमुळे ऐकण्याचा ओढा वाढला. आणि मग राष्ट्रीय पातळीवर अटलजींच्या भाषणांची गोडी वाटू लागली. १९९८ साली ते जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा पासुन तर त्याची भाषणं चुकवणं म्हणजे कायदेशीर गुन्हाच वाटू लागला. खुप काही कळत नव्हतं, जनसंघ, श्यामाप्रसाद, जयप्रकाश, हेडगेवार, पण एवढं मात्र नक्की समजत होते की हा त्याच्या पंक्तीत ला नेता आहे. अटलजी.
लोकमान्य, महात्मा, स्वातंत्र्यवीर, पंडीतजी, आम्ही पाहिले नाहीत, अनुभवले नाहीत. पण अटलजी, आडवाणीजी, इंदिराजी आणि बाळासाहेबांसारखी नेतृत्व ऐकायला, बघायला, वाचायला मिळाली हे आमचं भाग्यच. पुढची पीढी बहुतेक कमनशीबी.
बाळासाहेब आणि अटलजी दोन टोकाची व्यक्तीमत्व पण विचार, ध्यास धर्म एकच "हिंदुत्व".जणू टिळक आणि आगरकरच.
एकाने शुन्यातून संघटना काढली आणि एक संघटनेतून नंबर एकवर आला.
"तिरंगा" चा अभिमान हा विविध कलरची जैकेटस, झब्बे आणि पगड्या घालून मिरवायचा नसतो तर तो सदैव आपल्या दोन डोळ्यांच्या बाहुल्या मधे चमकवत ठेवायचा असतो हे कित्येक प्रसंगातून सिद्ध करणारे अटलजी.
एका पीढीने त्यांना घडतांना पाहिले, आमच्या पीढीने त्यांना इतरांना घडवतांना पाहिले आणि पुढच्या पीढीने त्यांनी घडवलेली माणसं पाहीली. त्यामुळे ह्या तीनही पीढ्यात तुमच्या बद्दल आदर आणि प्रेम दिसून आले.
सत्ताकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी राजकारण करणारा शेवटचा नेता भारताने गमावला.
अटलजींचा बोलताना येणारा तो पॉझ फारच अश्वासक होता. तो पॉझ म्हणजे सध्या Leadership Skills मधे शिकवल जाणारं (Stefan Covey) don't React , do Respond चं उत्तम उदाहरणच.
पहिला बिगर कॉंग्रेसी, स्वबळावर आलेला पंतप्रधान हि भरारी फार मोठी होती. हयाचं महत्त्व तेच लोक जाणतात ज्यानी १९५० ते १९९० पर्यंत चा काळ आणिबाणी सकट अनुभवला आहे.
दोन खासदारांपासून ते संसदेच्या उच्च पदावर पोहचण्याचा तुमचा संघर्षमय प्रवास, हा राजकारणात समाजकारण करणाऱ्या कार्यकर्ता्यासाठी कुराण, बायबल आणि भगवद्गीता च आहे.
तुम्ही शरीराने जरी प्रुथ्वीतलावर आता नसलात तरी आमच्या मनात कायम जिवंत आहात अटलजी
भावनाऐ तो बहुत उभर कर आइ हैं।
लेकीन शब्दोंमे उसे जाया नहीं करूंगा।।
आपका विचार आपकी सोच,आदर्श से
देशभक्ती का जजबा मै अटल रखुंगा ।।
मै अटल रखुंगा ।।
-- मिलिंद सहस्त्रबुद्धे ©

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि