इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोलणार..हे साधं आदल्या दिवशी शेंबड्या पोराला सुद्धा कळलं होतं. मग का नाही रात्र भरात काही स्ट्रेटेजी प्लान केली. आणि जर केली तर मग दिसली का नाही. एखादी बैटींग ओर्डर चेंज करुन इंग्लंड च्या बौलरसना गाफिल करता आले असते.
एकतर टीम सिलेक्शन करतांना मिडिया चे प्रेशर घेऊन एडिशनल स्पीनर घेतला, बरं पीचचा अंदाज आल्यावर फास्ट बौलरसना जास्तीचा स्पेल देता आला असता. उन्हामुळे आपल्याला तोटा झाला, पण इतका त्यांनी चारशे पर्यंत जावे आपल्या चौपट.
एकतर टीम सिलेक्शन करतांना मिडिया चे प्रेशर घेऊन एडिशनल स्पीनर घेतला, बरं पीचचा अंदाज आल्यावर फास्ट बौलरसना जास्तीचा स्पेल देता आला असता. उन्हामुळे आपल्याला तोटा झाला, पण इतका त्यांनी चारशे पर्यंत जावे आपल्या चौपट.
आपण फलंदाजी मधे सारखं विराट विराट कीती करणार, हे म्हणजे अमिताभ चा डबल रोल आहे म्हणून सेटमैक्सच्या सुर्यवंशमला नैशनल आवॉर्ड देण्यासारखे आहे. आमच्या लहानपणी एक फटाका होता चमनचीडी, ती जशी पेटवल्यावर कशीही कुठेही जायची, तसे त्या अंडरसनचे आणि व्होकस्चे बौल घुसत होते आणि आमची कागदी वाघ शिकार होत होते.
आपण प्रैक्टिस मैचेस कुठे खेळलो तर आयरलंड मधे, दमट वातावरणात. आणि त्यांच्या जोरावर इंग्लंड मधे डायरेक्ट उतरलो. राज्य नाट्य स्पर्धेसाठी सिरीयल मधे काम करण्याचा प्रकार आहे हा.
आयपीएल आणि टिट्वेंटी च्या परफॉर्मन्स वर आपण टेस्ट मैच संघ निवडत गेलो तर भारताचे परदेशातील ट्रेक रेकॉर्ड खालावतच जाणार. हिमेश सुपरहिट गाणी देतो म्हणून श्रीनिवास जोशी त्याची सवाई ला महफिल लावत नाहीत. इंग्लंड मधे टेस्ट ला खेळताना बैठक पाहिजे, पेशन्स पाहीजे तीथे टीटिट्वेंटी सारखं फास्ट रनची घाई योग्य नाही. गावसकर शीव्या खायचा पण साला त्या बावीस यार्ड वर भेदक मार्यासमोर टीचून टिकून दिवसभर उभा रहायचा. द्रविड, लक्ष्मण भले चौकार षटकार, शंभर चे रेकॉर्ड करत नसतील पण एकदा पीच वर बैट घेऊन उभे राहिले की अंबुजा सिमेंट ना भाऊ.
आपले बैट्समन इतके टि ट्वेंटी मय झालेत की टैस्ट मैच मधे सुध्दा सगळे जण मिळून २० ओव्हर च्या वर मैदानावर थांबत नाहीत.
तो व्होक्स एक मैच येतो, विकेट्स काढतो, परत जवळपास दिडशे रन ठोकतो, कसं काय जमतं बुवा!
आपले शहाणे रहाणे, ज्याच्या नावातच फक्त विजय आहे, पहिल्या इनिंग ला विराटने खाल्ला अशी सहानुभूती मिळाल्यावर किमान दुसर्या इनिंग ला खेळेल असा पुजारा..कोणीच खेळत नाही. पांड्या आणि अश्विन किमान तीशी चाळीशी पर्यंत तरी पोहोचले, बाकी सर्व महारथी षोडश वयातच धारातीर्थी पडले.
तो व्होक्स एक मैच येतो, विकेट्स काढतो, परत जवळपास दिडशे रन ठोकतो, कसं काय जमतं बुवा!
आपले शहाणे रहाणे, ज्याच्या नावातच फक्त विजय आहे, पहिल्या इनिंग ला विराटने खाल्ला अशी सहानुभूती मिळाल्यावर किमान दुसर्या इनिंग ला खेळेल असा पुजारा..कोणीच खेळत नाही. पांड्या आणि अश्विन किमान तीशी चाळीशी पर्यंत तरी पोहोचले, बाकी सर्व महारथी षोडश वयातच धारातीर्थी पडले.
नुसतं एग्रेशन आणि शुsssक ची एक्टींग करून चालत नाही, तर मैच जिंकून द्यावी लागते. "है कोई माई का लाल । जो विजय को हाथ लगा सके। " असा डायलॉग बच्चन नी कुली मधे मारायचा आणि स्वतः च मार खायचा कसं वाटेल.
तरी बरं सध्या कॉमेंट्री उपदेशकच प्रशिक्षक आहेत. जीथं त्यांच्या अदील रशीदला बौल हातातसुध्दा मिळाला नाही तीथं आम्ही दोन दोन स्पीनर घेऊन खेळलो.
तरी बरं सध्या कॉमेंट्री उपदेशकच प्रशिक्षक आहेत. जीथं त्यांच्या अदील रशीदला बौल हातातसुध्दा मिळाला नाही तीथं आम्ही दोन दोन स्पीनर घेऊन खेळलो.
आपण काही शिकणार आहोत की नाही. का एक रूपाया वाल्या लौटरीच्या दुकानात सत्तर रुपायची लौटरी लागल्यावर घरी सण साजरा करतात तसे आयपीएल आणि टि ट्वेंटी च्या तुटपुंज्या यशाचे सोहळे भरवणार.
सचिन जरी अर्जुनाला क्रिकेट चे सल्ले देणार नाही असं म्हणाला तरी कदाचित परवाची मैच बघता, त्यानीच अर्जुनाला असली मैच बघण्यापेक्षा झोप काढ म्हणून सांगितले असेल.
असो...पुढच्या मैचला शास्त्रीजी आणि शिष्य, काही तरी विराट चमत्कार करतील ही अपेक्षा.
आपलाच..
(उंदीर मारणाच्या विभागात काम करणारा सामान्य कर्मचारी..इति पुलं)
पुणे ३०.
(उंदीर मारणाच्या विभागात काम करणारा सामान्य कर्मचारी..इति पुलं)
पुणे ३०.
No comments:
Post a Comment