Skip to main content

ओह माय लॉर्ड(स्).......इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोल

इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोलणार..हे साधं आदल्या दिवशी शेंबड्या पोराला सुद्धा कळलं होतं. मग का नाही रात्र भरात काही स्ट्रेटेजी प्लान केली. आणि जर केली तर मग दिसली का नाही. एखादी बैटींग ओर्डर चेंज करुन इंग्लंड च्या बौलरसना गाफिल करता आले असते.
एकतर टीम सिलेक्शन करतांना मिडिया चे प्रेशर घेऊन एडिशनल स्पीनर घेतला, बरं पीचचा अंदाज आल्यावर फास्ट बौलरसना जास्तीचा स्पेल देता आला असता. उन्हामुळे आपल्याला तोटा झाला, पण इतका त्यांनी चारशे पर्यंत जावे आपल्या चौपट.
आपण फलंदाजी मधे सारखं विराट विराट कीती करणार, हे म्हणजे अमिताभ चा डबल रोल आहे म्हणून सेटमैक्सच्या सुर्यवंशमला नैशनल आवॉर्ड देण्यासारखे आहे. आमच्या लहानपणी एक फटाका होता चमनचीडी, ती जशी पेटवल्यावर कशीही कुठेही जायची, तसे त्या अंडरसनचे आणि व्होकस्चे बौल घुसत होते आणि आमची कागदी वाघ शिकार होत होते.
आपण प्रैक्टिस मैचेस कुठे खेळलो तर आयरलंड मधे, दमट वातावरणात. आणि त्यांच्या जोरावर इंग्लंड मधे डायरेक्ट उतरलो. राज्य नाट्य स्पर्धेसाठी सिरीयल मधे काम करण्याचा प्रकार आहे हा.
आयपीएल आणि टिट्वेंटी च्या परफॉर्मन्स वर आपण टेस्ट मैच संघ निवडत गेलो तर भारताचे परदेशातील ट्रेक रेकॉर्ड खालावतच जाणार. हिमेश सुपरहिट गाणी देतो म्हणून श्रीनिवास जोशी त्याची सवाई ला महफिल लावत नाहीत. इंग्लंड मधे टेस्ट ला खेळताना बैठक पाहिजे, पेशन्स पाहीजे तीथे टीटिट्वेंटी सारखं फास्ट रनची घाई योग्य नाही. गावसकर शीव्या खायचा पण साला त्या बावीस यार्ड वर भेदक मार्यासमोर टीचून टिकून दिवसभर उभा रहायचा. द्रविड, लक्ष्मण भले चौकार षटकार, शंभर चे रेकॉर्ड करत नसतील पण एकदा पीच वर बैट घेऊन उभे राहिले की अंबुजा सिमेंट ना भाऊ.
आपले बैट्समन इतके टि ट्वेंटी मय झालेत की टैस्ट मैच मधे सुध्दा सगळे जण मिळून २० ओव्हर च्या वर मैदानावर थांबत नाहीत.
तो व्होक्स एक मैच येतो, विकेट्स काढतो, परत जवळपास दिडशे रन ठोकतो, कसं काय जमतं बुवा!
आपले शहाणे रहाणे, ज्याच्या नावातच फक्त विजय आहे, पहिल्या इनिंग ला विराटने खाल्ला अशी सहानुभूती मिळाल्यावर किमान दुसर्या इनिंग ला खेळेल असा पुजारा..कोणीच खेळत नाही. पांड्या आणि अश्विन किमान तीशी चाळीशी पर्यंत तरी पोहोचले, बाकी सर्व महारथी षोडश वयातच धारातीर्थी पडले.
नुसतं एग्रेशन आणि शुsssक ची एक्टींग करून चालत नाही, तर मैच जिंकून द्यावी लागते. "है कोई माई का लाल । जो विजय को हाथ लगा सके। " असा डायलॉग बच्चन नी कुली मधे मारायचा आणि स्वतः च मार खायचा कसं वाटेल.
तरी बरं सध्या कॉमेंट्री उपदेशकच प्रशिक्षक आहेत. जीथं त्यांच्या अदील रशीदला बौल हातातसुध्दा मिळाला नाही तीथं आम्ही दोन दोन स्पीनर घेऊन खेळलो.
आपण काही शिकणार आहोत की नाही. का एक रूपाया वाल्या लौटरीच्या दुकानात सत्तर रुपायची लौटरी लागल्यावर घरी सण साजरा करतात तसे आयपीएल आणि टि ट्वेंटी च्या तुटपुंज्या यशाचे सोहळे भरवणार.
सचिन जरी अर्जुनाला क्रिकेट चे सल्ले देणार नाही असं म्हणाला तरी कदाचित परवाची मैच बघता, त्यानीच अर्जुनाला असली मैच बघण्यापेक्षा झोप काढ म्हणून सांगितले असेल.
असो...पुढच्या मैचला शास्त्रीजी आणि शिष्य, काही तरी विराट चमत्कार करतील ही अपेक्षा.
आपलाच..
(उंदीर मारणाच्या विभागात काम करणारा सामान्य कर्मचारी..इति पुलं)
पुणे ३०.

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि