Skip to main content

ओह माय लॉर्ड(स्).......इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोल

इंग्लंड तिसऱ्या दिवशी सकाळी दोन तास खेळणार आणि मग डिक्लिअर करुन आपली खोलणार..हे साधं आदल्या दिवशी शेंबड्या पोराला सुद्धा कळलं होतं. मग का नाही रात्र भरात काही स्ट्रेटेजी प्लान केली. आणि जर केली तर मग दिसली का नाही. एखादी बैटींग ओर्डर चेंज करुन इंग्लंड च्या बौलरसना गाफिल करता आले असते.
एकतर टीम सिलेक्शन करतांना मिडिया चे प्रेशर घेऊन एडिशनल स्पीनर घेतला, बरं पीचचा अंदाज आल्यावर फास्ट बौलरसना जास्तीचा स्पेल देता आला असता. उन्हामुळे आपल्याला तोटा झाला, पण इतका त्यांनी चारशे पर्यंत जावे आपल्या चौपट.
आपण फलंदाजी मधे सारखं विराट विराट कीती करणार, हे म्हणजे अमिताभ चा डबल रोल आहे म्हणून सेटमैक्सच्या सुर्यवंशमला नैशनल आवॉर्ड देण्यासारखे आहे. आमच्या लहानपणी एक फटाका होता चमनचीडी, ती जशी पेटवल्यावर कशीही कुठेही जायची, तसे त्या अंडरसनचे आणि व्होकस्चे बौल घुसत होते आणि आमची कागदी वाघ शिकार होत होते.
आपण प्रैक्टिस मैचेस कुठे खेळलो तर आयरलंड मधे, दमट वातावरणात. आणि त्यांच्या जोरावर इंग्लंड मधे डायरेक्ट उतरलो. राज्य नाट्य स्पर्धेसाठी सिरीयल मधे काम करण्याचा प्रकार आहे हा.
आयपीएल आणि टिट्वेंटी च्या परफॉर्मन्स वर आपण टेस्ट मैच संघ निवडत गेलो तर भारताचे परदेशातील ट्रेक रेकॉर्ड खालावतच जाणार. हिमेश सुपरहिट गाणी देतो म्हणून श्रीनिवास जोशी त्याची सवाई ला महफिल लावत नाहीत. इंग्लंड मधे टेस्ट ला खेळताना बैठक पाहिजे, पेशन्स पाहीजे तीथे टीटिट्वेंटी सारखं फास्ट रनची घाई योग्य नाही. गावसकर शीव्या खायचा पण साला त्या बावीस यार्ड वर भेदक मार्यासमोर टीचून टिकून दिवसभर उभा रहायचा. द्रविड, लक्ष्मण भले चौकार षटकार, शंभर चे रेकॉर्ड करत नसतील पण एकदा पीच वर बैट घेऊन उभे राहिले की अंबुजा सिमेंट ना भाऊ.
आपले बैट्समन इतके टि ट्वेंटी मय झालेत की टैस्ट मैच मधे सुध्दा सगळे जण मिळून २० ओव्हर च्या वर मैदानावर थांबत नाहीत.
तो व्होक्स एक मैच येतो, विकेट्स काढतो, परत जवळपास दिडशे रन ठोकतो, कसं काय जमतं बुवा!
आपले शहाणे रहाणे, ज्याच्या नावातच फक्त विजय आहे, पहिल्या इनिंग ला विराटने खाल्ला अशी सहानुभूती मिळाल्यावर किमान दुसर्या इनिंग ला खेळेल असा पुजारा..कोणीच खेळत नाही. पांड्या आणि अश्विन किमान तीशी चाळीशी पर्यंत तरी पोहोचले, बाकी सर्व महारथी षोडश वयातच धारातीर्थी पडले.
नुसतं एग्रेशन आणि शुsssक ची एक्टींग करून चालत नाही, तर मैच जिंकून द्यावी लागते. "है कोई माई का लाल । जो विजय को हाथ लगा सके। " असा डायलॉग बच्चन नी कुली मधे मारायचा आणि स्वतः च मार खायचा कसं वाटेल.
तरी बरं सध्या कॉमेंट्री उपदेशकच प्रशिक्षक आहेत. जीथं त्यांच्या अदील रशीदला बौल हातातसुध्दा मिळाला नाही तीथं आम्ही दोन दोन स्पीनर घेऊन खेळलो.
आपण काही शिकणार आहोत की नाही. का एक रूपाया वाल्या लौटरीच्या दुकानात सत्तर रुपायची लौटरी लागल्यावर घरी सण साजरा करतात तसे आयपीएल आणि टि ट्वेंटी च्या तुटपुंज्या यशाचे सोहळे भरवणार.
सचिन जरी अर्जुनाला क्रिकेट चे सल्ले देणार नाही असं म्हणाला तरी कदाचित परवाची मैच बघता, त्यानीच अर्जुनाला असली मैच बघण्यापेक्षा झोप काढ म्हणून सांगितले असेल.
असो...पुढच्या मैचला शास्त्रीजी आणि शिष्य, काही तरी विराट चमत्कार करतील ही अपेक्षा.
आपलाच..
(उंदीर मारणाच्या विभागात काम करणारा सामान्य कर्मचारी..इति पुलं)
पुणे ३०.

Comments

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...
"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...