Skip to main content

‎नटसम्राट.......ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे..। असं गुणगुणत आपण ह्याच्या प्रेमात पडतोच. असाच

ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे..। असं गुणगुणत आपण ह्याच्या प्रेमात पडतोच. असाच अजब माणूस आहे हा. राकट, रखरखीत, तडक अंगावर येणारा, अचानक भावनिक, दिसायला सर्वसामान्य. तरीपण एकदा का भेटला, बोलला, अनुभव ला का अगदी आपलासा वाटणारा. सच्चा, खरा..जितका पोटात तितकाच ओठात असणारा, भीड न बाळगणारा. शेतकरी कष्टकरी वर्गाची कणव असणारा "नाना". विश्वनाथ (पाळण्यातले नाव) उर्फ नाना पाटेकर.
रंगभूमी ची ताकद काय असु शकते ह्याची कलास्रुष्टीत जी काही उत्तुंग उदाहरणं आहेत त्यात एकदम वरच्या नंबरात नानाचा नंबर लागतो. नाटकांच्या बेकस्टेजचे सेट लावणाचे काम करण्यापासून ते अगदी आत्ता Welcome मधल्या मल्लिका शेरावतचा on screen लव्हर कंट्रोल उदय म्हणणारा उदय शेट्टी पर्यंत चा त्याच्या प्रवास एक अलिखित रोमांचक आत्मचरित्रच आहे.
विजयाबाईं मेहतांच्या मुशीत आणि समांतर प्रायोगिक रंगभूमीच्या कुशीत रुजलेलं हे खडकावरचं बीज पुढे जाउन इतका मोठा वटवृक्ष होइल, असं कदाचित तेव्हाच्या त्यांच्या समकालीन कलाकारांनाही वाटलं नसेल.
सिंहासन मधला तो बेलबोटम पैंट घातलेला किडकिडीत शरीर यष्टीतला चिरकुट स्मगलर आणि फक्त फटके खाण्याचाच रोल असणारा नाना, परींदा मधे डोक्यावर हात मारत आपल्या अंगावर येतो आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवतो. कष्ट, जिद्द आणि पोटाची खळगी भरतांना माणूस कीती दूरपर्यंत एखादी कला शिकतो ह्याची जाणीव होते. मराठी रंगभूमीची ही किमया औरच आहे.
ह्या संपूर्ण प्रवासात त्यानं विविध प्रकारच्या भुमिका रंगवल्या आहेत आणि यशस्वी हिट केल्या आहेत. तरीपण तो कधीही सो कॉल्ड सुपरस्टार झाला नाही की स्टारडम त्यांच्या लेंग्याला चिकटले नाही. तो कायमच लेंगा झब्ब्यातला साधा नानाच राहिला.
रंगभूमी तो जेवलाय, प्यायलाय, उठलाय, बसलाय, झोपलाय अक्षरशः जगलाय. कधीकधी तर तो नाटकाच्या प्रयोगानंतर त्या रंगमंचावर आईच्या कुशीत झोपावं तसा झोपलासुध्दा असेल, इतका तो रंगभूमीशी एकरूप होता. जेवढी तो नाटकात भुमिका प्रयोग बर प्रयोग जीवंत करायचा, तितकीच तीन तासाच्या सिनेमात रंगभूमी असल्यासारखा जीवंत अभिनय बांधयचा.
नाना पाण्यासारखा आहे; चव, रंग, आकार नसलेला. तुम्ही ज्या भुमिकेत त्याला टाकाल, त्या भुमिकेची चव, रंग, आकार घेणारा. अब तक छप्पन पाहिल्यावर त्याच्यात आपल्याला दया नायक आपसूकच दिसतो; खामोशी बघतांना बधिर मुक बाप आपण जवळून समजू शकतो; आणि अग्नीसाक्षीतला तो विक्षिप्त नवरा कसा विसरु; तर अंगार मधला स्वतःच्या मतिमंद मुलाला विषाचे इंजेक्शन थंड चेहर्याने कैडबरीतून देणारा बिल्डर बाप आणि अश्या बर्याच भुमिका.
पु लं नी जशी व्यक्ती आणि वल्ली मधून विविध पात्रे लेखणीतून जीवंत केली तशी नाना ने त्याच्या वजूद सिनेमात विविध भुमिका जीवंत केल्यात. वजूद मधे तो माधुरी ला एक, दोन, तीन..म्हणत दहा म्हटल्यावर जे डोळे भरून पाणी आणून दाखवतो, तेव्हा तो हॉलीवूड च्या अल् पचीनो च्या च पंक्तीत जाउन बसतो.
कदाचित त्या अभिनयामुळे माधुरीला खर्या "एक दो तीन" चा अर्थ तेव्हा कळाला असेल.
सई परांजपेंच्या "दिशा" सिनेमात ला तो टिपिकल टोपीवाला मुंबईतला गिरणी कामगार. तो जेव्हा मुंबई मार्केट मधे आपल्या गावाकडच्या बायको साठी ब्रा खरेदी करायला जातो तेव्हा नानाने जे भाव चेहऱ्यावर उमटवले आहेत ते लाजवाब. तेव्हढाच अभिनय बघण्यासाठी तो सिनेमा पहावा इतका नैसर्गिक.
बॉलिवूड मधल्या प्रत्येक सुपरस्टार बरोबर ह्या "सुपर एक्टर" नी पिक्चर केलाय. जानी..राजकुमार पासून ते खिलाडी अक्षयकुमार पर्यंत. सगळी "खान"मंडळी, दिग्गज बिग बी आणि सावली ज्युनिअर बी बरोबर सुध्दा. प्रत्येक पिक्चर मधे तोडीसतोड अभिनय. उगाच स्वतः प्रत्येक फ्रेम मधे आपणच दिसणार असा अट्टाहास न करता. तो रागीट आहे, विक्षिप्त आहे अशी हवा असतांना सुध्दा; कलास्रुष्टीतला प्रत्येकजण त्याच्या बरोबर पिक्चर करण्यास उत्सुक असायचा. मग नवीन पिक्चर प्रदर्शनाचे वेळी पत्रकारांचा ठरलेला बकवास प्रश्न "नाना बरोबर काम करतांना तुमचा काय अनुभव होता?" ...अरे नाना म्हणजे काय डायनासोर आहे का...
अर्धवट वाढलेल्या दाढी वरुन हात फिरवल्यावर जो फील येतो तसा त्याचा तो खरखरीत स्वभाव, तरीही सर्वांना हवाहवासा वाटतो. जसं जिव्हाळी लागली की नखाला सारखा हात लावावसा वाटतो आणि ते हलकं दुखःपण वेगळा आनंद देतं तसा. प्रत्येक हिंदी-मराठी हीरोईन त्याच्या ह्या मराठमोळ्या रांगडेपणावर फिदा होती आणि आहे.
तो कधीच कुठल्या कैम्पमधे अडकला नाही, कधीच मी मराठीत परतणार, आता मी पुन्हा नाटक करणार किंवा मला सिरीयल करायला आवडेल असले फार्सिकल प्रयोग त्याने केले नाहीत. जे करावसं वाटलं ते बिनधास्त केलं आणि नाही वाटलं ते पण केलं. बिनदिक्कतपणे पैश्यासाठी केलं म्हणणारा एकमेव एक्टर.
घरच्या गणपतीची फुलांची आरास सजवतांना तो निस्सीम श्रध्दाळू देवभक्त वाटतो. मग पुढच्याच काही मिनिटात बाहेरच्या खोलीत येवून जेव्हा "का रे भडव्या, मागच्या वर्षी आला नाहीस?" असं बशीतून चहा पितांना खेकसतो तेव्हा उगाच कट्टर समाजवादी असणार अशी खोटी खोटी खात्री पटते.
त्याची नक्कल करणारे खुप आहेत इंडस्ट्रीत. ती कदाचित अवघड असून सोपी वाटेल इतकं अवघड आयुष्य तो जगलाय. नाकाच्या शेंड्याला आरसा टेकवल्यावर डोळे जितके आत खोलवर दिसतात, तेवढी जवळून त्याने गरीबी पाहिलीय आणि अनुभवलीयसुध्दा. त्याच्या प्रत्येक भुमिकेत त्या अनुभवांची झलक आपल्याला पाह्यला मिळते.
तो इतका सच्चा वाटतो की तुम्ही स्वतःच्या मतांवर कितीही ठाम असलात तरीही त्याची प्रत्येक विषयावरची मतं, भुमिका योग्य वाटू लागते. अगदी राजकारणतल्या ठाकरें पासून ते समाजकारणातल्या शेतकरी आदिवासी ठाकरां पर्यंत.
मेथड एक्टर, भुमिकेत शिरणे, काही दिवस त्या व्यक्तीरेखेसाठी विशिष्ट वस्तीत जाउन राहणे, भाषेचे क्लास लावणे, वजन वाढवणे-परत कमी करणे, क्रुत्रीम फैन फोलोइंग निर्माण करणे, सोशल मिडिया वर एक्टिव असणे....असल्या कीती खर्या कीती खोट्या मेहनती कसरती त्यानं घेतल्याचे कधीच ऐकीवात नाही. सिनेमा ची कथा आवडली, पिक्चर स्विकारलं बास शुटींग सुरु. नाना तुमची एन्काऊंटर स्पेशालिस्ट ची भुमिका आहे ईंनस्पेक्टर साधू आगाशे.. हातात पिस्तूल घेतलं नाना सुरु. पुढचा पिक्चर अपहरण नाना पाटेकर जी आप इसमे यु पी बिहार के टिपिकल राजनेता हो..पांढरा शर्ट पैंट घालून हात जोडून चालायला सुरवात हुबेहूब...तरबेज आलम शुटिंग सुरु. नाना आता तुम्ही प्रकाश आमटे बरं का! झालं बनियन हाफ चड्डी घातली बास एवढीच तयारी शुटिंग सुरु पिक्चर हीट....
अहो इतकं ट्रान्सफारमेशन तर तो रंग बदलणारा सरडा सुध्दा करु शकत नसेल. खरंच नाना प्रत्येक भुमिकेत इतका केमोफ्लैज होउन जातो कि तो नाना आहे का प्रत्यक्षात ते जीवंत पात्रच...
To Be Or Not To Be...नाना,
हो तुच आहेस तो अंकुश चा रवी, क्रांतीवीरचा प्रताप, थोडासा रुमानीचा बारीशकर, परींदा चा आण्णा, तिरंगा चा मराठा, प्रहार चा मेजर चौहान आणि वेलकमचा उदय शेट्टी...
तूच आहेस खरा नटसम्राट.
---मिलिंद सहस्रबुद्धे ©

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि