Skip to main content

शिदोरी...............काय गं ऋचा काय झालं? "आई, मी बाबावर खुप चिडलीय, असा कसा वागू शकतो तो? How he .....

काय गं ऋचा काय झालं? "आई, मी बाबावर खुप चिडलीय, असा कसा वागू शकतो तो? How he dare to touch my phone? माझा मोबाईल चेक करायला लहान का आहे मी आता." असं म्हणत नेहमीप्रमाणे ती आपल्या रुममध्ये जाऊन दार लावून झोपली. आमची ऋचा एकदम पटकन चिडते आणि गेल्या वर्षी कॉलेज ला जायला लागल्यापासून तर जरा जास्तच. चिक्कार मित्रमैत्रिणी, सतत पार्टी, ट्रिप्स, पिक्चर्स चालू असतं. आम्ही पण जास्त डिवचत नाही. कारण अर्थातच बाईसाहेब अभ्यासात हूशार. मुळात बुध्दीमत्ता आहे वडिलांसारखी. त्यामुळे घोकंपट्टी नाही, एकदा का कॉन्सेप्ट समजली की झालं. कायम डिस्टींक्शन असते. तशी शाळेपासून च नीटनेटकी, हुशार, बर्याच वेळा वर्गाची मॉनिटर आणि पहिल्या पाचात होती ऋचा. बारावीमध्ये ९४% होते, पण micro physics मधे रिसर्च करायचा म्हणून BSc ला ऐडमिशन घेतली. अश्या ह्या आमच्या ऋचाबाई.
संध्याकाळी अभय ऑफिसमधून आला, नेहमीप्रमाणे चहा खाणं झाल्यावर "अनिता......ऋचा कुठाय गं? का आजपण मैत्रीणीकडे अभ्यासाला हां?"...त्याचा तो नेहमीचा मिश्कील खोडकर स्वर मला जाणवला. मग मीच पुढे होउन म्हंटलं "नाही रे, आत्ताच झोपलीय जरा रूममध्ये" ...
लगेच अभयचा स्वर पाघळला "का काय झालं?".. तीच्याबाबतीत क्षणार्धात तो इतका बदलतो की काही विचारु नका.
"अरे, काही नाही, चिडलीय तुझ्यावर आणि मग नेहमीचा फुगा करून झोपली. म्हणे तू तीचा मोबाईल तीला न विचारता बघीतलास".
" ओह! हं..असं, ठिके बघू उठल्यावर".
काही वेळातच ऋचा बाहेर आली, अभय लीव्हींग मधे टिव्ही बघत होता. "आई.....कॉफी आणि please हं strong कर जरा". अभयच्या हातातून रीमोट घेऊन तीने टिव्ही बंद केला.
" बाबाss मी चिडलीय तुझ्यावर, का पाहीलास माझा फोन तू?"
अभय शांत. त्याच्या नेहमीच्या स्टाईल मधे मान थोडी खाली करत चष्म्याच्या वरच्या बाजूने तीच्याकडे बघून म्हणाला
"ये बस जरा इथे. का नाही पहायचा? मी फोन पाहिल्यावर तुला काही विचारले, बोललो काही नाही ना?"
"नाही तरीपण का?" ऋचा.
तेवढ्यात मी कॉफी आणली आम्हा तिघांना. अभय बोलतच होता.
"बेटा, तुला आठवतंय, तू साधारण पाचवी सहावी त असशील, तेव्हापासून तू माझा मोबाईल खेळतीयस. सुरवातीला गेम्स, मग युट्यूब, मग माझ्या व्हाट्सएपवरचे जोक्स. नववी दहावी नंतर तुझा स्वतः चा इमेल आय डी, त्याच्यवरच्या इमेल. अकरावी त फेसबुक इंनस्टाग्राम अकाउंटस. मागच्या वर्षी पासुन तुझा स्वतः चा मोबाईल आणि तुझी स्वतः ची Privacy Settings.
जो पर्यंत तू माझ्या मोबाईल मधून सगळं ओपरेट करत होतीस ना तो पर्यंत मी निश्चिंत होतो बेटा. कारण हे गैजेट असं आहे की त्याची नशा ही सिगारेट, दारू आणि अगदी ड्रग्स पेक्षा ही भयंकर आहे. त्याची झिंग एकदा चढली की मग कधीच उतरत नाही. त्याच्यात एवढं काही साठलं आहे की तुम्ही कीतीही म्हणालात तरी बाहेर पडू शकत नाही. सिगारेट दारू तुमचं शरीर खाऊन टाकतात, पण हे गैजेट मुळे तुमच्या मनालाच कैन्सर होऊ शकतो. ज्याचा उपचार त्या विधात्याकडे सुध्दा नाही.
"आता तुझा स्वतः चा फोन, त्यामुळे माझा कंट्रोल शुन्य. थोडं जड जातं बेटा हे. मुलं जेव्हा मोठी होत जातात, आमच्या हातून चिउकाउचे घास न जेवता, स्वतः ची स्वतः जेवतात, तेव्हा मनातून खुप आनंद होतो. पण तेवढंच हलकं दुःख होतं की आता ती independent होणार, उडून जाणार. मग सर्वच बाबतीत वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर हा आनंद आणि हलकं दुःख साथ देत राहतं."
"तुला स्वतः शाळेत सोडण्याचा, बाय बाय करण्याचा एक आनंद होता. तू जेव्हा स्कुटीवर एकटी लांब कॉलेज ला जायला लागलीस तेव्हा तो आनंद अभिमानात रुपांतरीत झाला. आज आमच्या बरोबर राहते आहेस, उद्या मास्टर्स करायला परदेशात जाशील तेव्हाचा आनंद अभिमान काही वेगळाच असेल. अर्थात मग त्यात काळजी ह्या गुणधर्माची भर पडेल."
"बघ ना, कसं असतं मुलगी जन्माला येते, तीचं बालपण बघतांना आनंद होतो, पुढं तीचं कर्तृत्व बघतांना अभिमान वाटतो आणि मग सासरी गेली की काळजी"
अभयनी औंढा गिळला.
" बेटा, हा प्रवासच काही और आहे. आई ह्या नात्यासाठी तो नवीन नसतो कारण ते नातंच ह्या प्रवासातून जन्म घेतं. पण बापासाठी हा नवीन प्रवास कायम कठीण, खडतर असतो."
अभय आज एकदम वेगळाच दिसत होता. त्याचा तो मिश्कील स्वभाव कुठच्या कुठे निघून गेला होता. गेल्या पंचवीस वर्षात मी त्याला पहिल्यांदाच एवढं भावनिक झालेले पहात होते. नाहीतर एरवी तो practical आणि rational विचार मांडतो.
अभय नी ती गार झालेली कॉफी एका घोटात संपवली. जशी तो रेस्तराँ मधे Scotch bottoms up करतो तशी. मग ऋचाच्या जवळ जाऊन बसला.
"ऋचा, तुला सांगतो पुरुष आतून फार नाजुक असतो दगडात फुललेल्या दगडफुलासारखा..
नवरा आणि बाप ही दोन नाती त्याला अंतरबाहय बदलून टाकतात. तो एकाकी होउन बसतो. आता त्याला डोकं ठेवायला खांदा नसतो आणि डोळां पाणी टीपयला कपडा. अतरंगातली काळजी त्याला उसन्या कणखरतेने मांडावी लागते. जबाबदारी ही त्यांच्या प्रत्येक श्वासात जगू लागते. कारण जेव्हा श्वास थांबतील तेव्हाच त्यातून मुक्ती. रोजचा एक तरी घास अडखळूनच पुढे जातो. आणि फुकाच्या काळजीनं एकदा तरी ठोका चुकतो. शिवधनुष्यापेक्षाही अवजड आणि कवचकुंडलापेक्षाही अजरामर असे हे नातं आहे"
माझ्या कडे बघून पुढे म्हणाला "पुढचा जन्म तुम्हाला बाईचाच मिळाला पाहीजे म्हणणारी ती. तीला काय सांगणार, नवीन जीवाला पोटातून जन्म न देता सुध्दा जगणार्या पुुरुषाच्या ह्या प्रसुतीवेदना"
"आमच्या वेळेस साधी माला डी ची जाहिरात जरी टीव्ही वर लागली तरी आम्हाला पाणी आणयला किचन मधे पाठवायचे. आज पैडमैन सारखा पिक्चर आपण एकत्र पाहिला. नक्कीच ही सामाजिक सुधारणा कौतुकास्पद आहे. आजपर्यंत मी तुला कधीही टोकरले नाही, तुझ्यावर कायम इतरांपेक्षा जास्त विश्वास ठेवला आणि तुझ्या हो त हो मिसळत गेलो"
"पण ऋची, आता पुढील आयुष्य हे जरा वेगळ्या वळणावरचं आहे. तिथं तुझी तुलाच काळजी घ्यायचीय. रस्त्यावरच्या गाड्यांवर तळलेल्या बटाटा वड्यांचा खमंग वास आपल्याला नक्कीच त्या गाडीकडे ओढून घेऊन जातो, पण तो वडा कीती हायजेनिक आहे हे बघणं महत्त्वाचे असते. आपल्याला ररस्त्यावरचा तो बटाटा वडा खायचाय का चांगल्या रेस्तराँ मधील थ्री कोर्स डीनर हे ठरवण्याचं तुझं वय आहे."
"तुझ्या आईचं आणि माझं लव्ह अफेअर होतं मग आम्ही लग्न केलं पण आमचे संबंध आम्ही कधी माजघरात जाऊ दिले नाहीत. मैत्री ही कितीही जानी, घट्ट असली तरी त्यालाही काही लक्ष्मणरेषा आखायच्या असतात. कारण साधूच्या वेषातील रावण ही तर रामायणापासूनची परंपरा आहे."
"बेटा, तु जीवनात सगळं ट्राय कर मजा कर. मी तुझ्या पाठीशी आहे पण मला आधी सांगून कर. बीअर पी, सिगरेट ओढ पार्टी कर, पण हे सगळं करतांना कायम आपल्या घरची देवापाशी तेवणारी समई आठव. ती तेजोमय आहे पण एवढी ही भडक नाही की तीचा डोळ्यांना त्रास होईल."
"स्त्रीचा शील हा असा दागिना हे की जो तीचा तीनेच घडवायचा आणि जपायचा असतो. हा दागिना जपण्यासाठी एकच लॉकर तो म्हणजे संस्कार. जीच्यापाशी हा लॉकर, तीचा दागिना कायम सुरक्षित"
आणि मग अभयच्या डोळ्यातून पहिल्यांदा मी घळाघळा पाणी येतांना पाहिले. रुचा तर आधीपासूनच रडत होती. मी परत पटकन गरम कॉफी करून आणली.
ऋचाने अभयचा हात घट्ट पकडला होता.. "बाबा, मी सॉरी म्हणणार नाही, मला माहितेय तुला सॉरी, थँक्स मी म्हटलेलं आवडत नाही" थोडी हसली..
"तुझ्या लाडक्या मैने प्यार किया मधला डायलॉग आहे ना ..दोस्ती मै नो सॉरी नो थँक्स, आणि तु माझा पहिला मित्र आहेस ना बाबा."
"काळजी करू नकोस रे. तु आणि आईनं आमच्या पुढे कायमच संस्काराचं भरलेलं ताट न सांगता वाढलं आहेत, जसं नैवेद्याचं असतं तसं. अगदी डाव्याबाजूच्या चटणी कोशिंबीरीपासून ते उजव्या बाजूच्या खीरी पर्यंत. तु कायमच माझ्यावर विश्वास ठेवला आहेस, मी कधी कधी चुकले असेन पण तु माझ्या पाठीशी उभा राहिला आहेस. अगदी स्वामी समर्थ च्या वचनासारखा.
ह्याच विश्वासाची आणि संस्काराची "शिदोरी" सदैव पाठीवर बांधून मी हा पुढचा प्रवास करीन. आणि हो आभिमान हा काळजी पेक्षा श्रेष्ठ असतो हे मी सिध्द करीन"
ऋचाचं हे बोलणं ऐकून मला आमच्या कॉलेजडेज मधला माझा अभय परत आठवला....
--मिलिंद सहस्त्रबुद्धे ©

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि