Skip to main content

Posts

Present Value (PV) of चारमिनार

  "Present Value (PV) of चारमिनार" हैदराबादच्या पाण्यात आणि तिथल्या हवेत काही निराळी रसायन असावीत. ह्या हैदराबादनी आपल्या देशाला असे "पी व्ही" दिले की ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात एक अमुलाग्र बदल घडून आणला. एक होते Father of Indian Economic Reforms म्हणजे "पी व्ही नरसिंहराव". पी व्ही नरसिंहराव हे १९९१ -९६ या पाच वर्षात भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. काँग्रेसच्या सर्वसाधारण परंपरेला छेद देत प्रथमच एक बिगर गांधी-नेहरू पंतप्रधान म्हणून त्यांची कारकीर्द उदयास आली. अर्थातच ती खणखणीत वाखाणण्याजोगी होती. १९९१ साली पीव्हींनी ऐतिहासिक आणि क्रांतिकारक अर्थसंकल्प मांडला. ह्या अर्थसंकल्पाचे जनक होते डॉक्टर मनमोहन सिंग परंतु त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले ते पी व्ही नरसिंहराव. या अर्थसंकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे GATT करार. ( General Agreement on Tariffs and Trade) भारताच्या वाटचालीत नवीन आर्थिक पर्व त्या क्षणी सुरू झाले. ज्याचे वर्णन खाजगीकरण किंवा जागतिकीकरण असे कायम करण्यात आले. परंतु ह्यास आपण उदारीकरण असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आज सर्वज...

रोज़ रोज़ आँखों तले

रोज़ रोज़ आँखों तले...   Happy Birthday गुलज़ार साहब सुमधुर, मधाळ, रसरशीत, मदहोश, दर्दभरं अहो किती विशेषणं लावू कमीच पडतील. असे हे साधारण ऐंशीच्या दशकातील रोमँटिक गाणं. "रोज़ रोज़ आँखों तले" पडद्यावर रुक्ष ठोकळा संजय दत्त, त्याच्या जोडीला मनमोहक आकर्षक सुंदर दिसणारी मंदाकिनी. मंदाकिनी म्हणलं की कायम 'राम तेरी गंगा मैली' एवढंच सगळ्यांना आठवतं. हया गाण्यात मात्र जी काय गोड आणि लोभस दिसलीय ना त्याला खरंच तोड नाही. तीच्या मन मोकळ्या वावरामुळे संजुबाबाचा "ऐ बावा"पणा झाकला गेलाय हे मात्र नक्की. सिनेमावरील चर्चेच्या भाषेत सांगायचं तर हे गाणं मंदाकिनीनं पडद्यावर खाल्लंय. संपूर्ण गाणं कॅमेराच्या ब्लर (धुसर) तंत्रज्ञानाचा बॅकग्राउंड च्या स्वरूपात उपयोग करुन चित्रीत केलंय. साधारणतः संध्याकाळ ते रात्र याच्या मधल्या वेळच्या वातावरणात चित्रीत केलं गेलं आहे. त्यामुळे संध्याकाळचा तो प्रेमातला बेचैन, बेधुंद माहोल या गाण्याला अजूनच टवटवीत रोमँटिक करतो. गाणं संपतं तेव्हा पहाटेचा सुर्य उगवतांना दिसतो. दिग्दर्शक राज सिप्पीच्या कल्पना विस्ताराचं कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. "रो...

अनोळखी आठवण

  "अनोळखी आठवण" मोबाईलवर आलेल्या कॉलला ग्रीन बटन swipe करुन मी फोन कानाला लावला.... "हायss..." "हैलो.." "ओळखलं का? मी..." "अगं नंबर डिलीट केलाय...आठवणी नाही" असं बोलतांना मनातल्या मनात छदमी हसलो मी... मी विचारांचे कित्येक बोगदे पार केले क्षणार्धात. एवढी वर्षे झाली FB, Instagram वर एकमेकाला लाईक करणे ह्या virtual भेटी व्यतिरिक्त, प्रत्यक्ष भेटणं तर लांबच पण आम्ही दोघांनी साधं एकमेकांना पाहिले देखील नव्हतं. आज दोघंही शहराच्या एकाच भागात राहतो, पण काय देवाची किमया. एकदाही भेट झाली नाही की साधी नजरानजर. काय असेल हे त्या विधात्यालाच माहीत. भावनांची काय जादू असते, जेव्हा एकत्र होतो तेव्हा दोघांची घरं कित्येक किलोमीटर अंतरावर होती. तरी रोज भेटायचो. रोज फोन आणि रोज बोलणं, एकमेकाला बघणं व्हायचं. मी माझ्या बाईकवरून हायवे तुडवत पोहचणार आणि ती... ती बिचारी एक बस बदलून सिक्स सिटर करून यायची. मध्यवर्ती ठरलेलं ठिकाण. लॉ कॉलेजचा कॅम्पस. बाहेरच असलेलं कॉफी शॉप. साधारण संध्याकाळी रोज अर्धा तास. तोच अर्धा तास जणू दिवसभर भेटल्याचा आनंद द्यायचा. रविवारी मा...

#श्रावण ---कविता

  #श्रावण उन पावसाच्या खेळात एक श्रावणसर भांडली रुसून बसली डोंगरावर अन् हिरवी ओंजळ सांडली पाठशिवणीचा खेळ मांडला लपून बरसती मेघ धारा हलक्या धुक्यात हरवला क्षितिजावर तो शुक्र तारा पालवी वेलींना, पालवी मनाला पाना पानांवर बहरली चाहूल लागली गारव्याची अन् हिरवी पाती शहारली रानात पडलं हिरवं चांदणं फुलला मनमोहक मोर पिसारा आठवणींच्या भरती ओहोटीत अस्वस्थ होई मग दूर किनारा - सहजमि'त (मिलिंद) ता. क. - "शास्त्र असते ते" श्रावण आला कविता आली

चौरंग

  चौरंग वयोमानानुसार आणि विविध अनुभवांनी जीवन आपल्याला बरेच काय काय शिकवते.. कधी कधी आपणच अनावधाने केलेल्या चुका लक्षात येत नाहीत. पण निसर्गनियमाप्रमाणे परत आपल्याच बाबतीत असं घडल्यानंतर कुठेतरी आपण पण असं कधी वागलो होतं का असं वाटतं आणि आठवतात काही प्रसंग. आपण एखाद्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये फॅमिली बरोबर छान डिनर करत बसलेलो असतो. आपण वर्ष दोन वर्षांपूर्वी अश्याच ओळखीच्या एका माणसाचा अडलेले काम करून दिलेलं असतं. तेव्हा तो माणूस चार वेळा आपल्याला भेटून एखादी भेटवस्तू देऊन थँक्यू म्हणून आपल्याशी नम्रतेने वागत असतो. नेमका आज हॉटेलमध्ये तोच माणूस, ती व्यक्ती त्याच्या मित्रांबरोबर बसलेली असते. आपली नजरानजर होते. आपण त्याला हात करतो. तोही आपल्याला छान हात करतो. क्षणभर आपल्याला वाटतं की तो आता आपल्या इथे येईल, आपल्याशी काय म्हणताय म्हणून दोन शब्द नक्की बोलेल. आपण आपल्या घरच्यांशी जुजबी ओळख करून देऊ वगैरे. पण तो मात्र आपल्याला हात करून नंतर मित्रांच्या गप्पांमध्ये रंगलेला दिसतो. हा तोच आहे ना नक्की असा आपल्याला चार वेळा प्रश्न पडतो. दोन वर्षापूर्वी घडलेल्या प्रसंगांमध्ये अजून अडकलेली असते प्...

हम दो हमारे दो

 हम दो हमारे दो "कितने आदमी थे" "सरदार दो"  शोले सिनेमातला डायलॉग.  २०१४ च्या निवडणूक निकालानंतर प्रत्ययास आला आणि खूप प्रसिद्धही झाला.  गुजरातच्या दो आदमी (जय आणि विरु) नी भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. पक्षाच्या स्वप्नातलं आणि ध्येयातलं एक उद्दिष्ट त्यांनी साध्य केलं होतं. निर्विवाद बहुमत मिळवून देऊन देशात प्रथमच पक्षाची एक हाती सत्ता आणली.   १९४७ साली ब्रिटिश भारत सोडून गेले परंतु घराणेशाहीचा (शाप) वारसा मागे ठेवून गेले. जसं ब्रिटनमध्ये अजुनही राणीचंच राज्य आहे तसं भारतात मागील ७५ वर्षात मोजकी १०-१२ वर्ष सोडली तर एकाच घराणेशाहीच्या (आडनावाच्या) अंमलाखाली चालणारं सरकार होतं. ह्या गुलामगिरीला सलग दोन टर्म बहुमतात निवडून येत छेद दिला तो ह्या "दो आदमींनी".  २०१४ नंतर देशभरात राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये देखील "सरदार दो" डायलॉगचं प्रत्यंतर येत आहे. दोघांनी पाऊण भारत कमळमय केला. मागील आठ वर्षांत  घराणेशाहीची सत्ता देशातूनच नव्हे तर राज्याराज्यातून उलथवायला सुरुवात केलीय.  अर्थात प्रत्येक ठिकाणी गब्बर वेगळा आणि दोन्ही हात वर करुन भेदरले...

लग्न वाढदिवस

 दिनांक: ०६ /०७/२०२२ वेळ: दुपारी ४:०० (चहाची) स्थळ: अर्थातच सदाशिव पेठ पुणे ३० मी: "किती झाली गं?" माहिती असूनही मी मुद्दामूनच विचारलं.  ती: "लग्नाला १९ आणि भेटून २१ वर्ष. म्हणजे बेडीत अडकून १९ आणि चोरी करून २१" मी: "शिकलीस की बोलायला" ती: "हो का. तू ऐकायला शिकलायस असं म्हण" मी: "अर्थातच. आपला वाद एकतर्फीच असतो. संवाद म्हणशील तर तो बहुमुखी आहे" ती: " तो कसा काय बुवा?" मी: "आपल्या संवादात आधी आई-बाबा असायचे (अर्थात माझे) आणि आता दोन्ही मुलंही सामील असतात. म्हणून बहुमुखी " ती: "हो. हे मात्र खरं आहे. सुरुवातीला आई-बाबांचा तुला आधार असायचा आणि आता मुलंही तुझीच बाजू घेतात. तुझं कायमच बरं आहे." मी हसतो.  मी: "मग! मी आहेच तसा सर्वांना हवाहवासा" ती: "हो ना आई मात्र कायम नको. तुझी नाही हा तुझ्या मुलांची आई असं म्हणतेय मी. तुझ्या आईच्या बाबतीत मात्र असं होत नाही कधी" मी: "अगं, आजच्या दिवशी एवढं काय वाटून घेतेस. मी आपली सहज चेष्टा करतोय तुझी" ती: "बरोबर आहे! अंगाशी आलं की चेष्टा करतो...