Skip to main content

अनोळखी आठवण


 "अनोळखी आठवण"

मोबाईलवर आलेल्या कॉलला ग्रीन बटन swipe करुन मी फोन कानाला लावला....



"हायss..."
"हैलो.."
"ओळखलं का? मी..."
"अगं नंबर डिलीट केलाय...आठवणी नाही"
असं बोलतांना मनातल्या मनात छदमी हसलो मी...
मी विचारांचे कित्येक बोगदे पार केले क्षणार्धात. एवढी वर्षे झाली FB, Instagram वर एकमेकाला लाईक करणे ह्या virtual भेटी व्यतिरिक्त, प्रत्यक्ष भेटणं तर लांबच पण आम्ही दोघांनी साधं एकमेकांना पाहिले देखील नव्हतं.
आज दोघंही शहराच्या एकाच भागात राहतो, पण काय देवाची किमया. एकदाही भेट झाली नाही की साधी नजरानजर. काय असेल हे त्या विधात्यालाच माहीत.
भावनांची काय जादू असते, जेव्हा एकत्र होतो तेव्हा दोघांची घरं कित्येक किलोमीटर अंतरावर होती. तरी रोज भेटायचो. रोज फोन आणि रोज बोलणं, एकमेकाला बघणं व्हायचं.
मी माझ्या बाईकवरून हायवे तुडवत पोहचणार आणि ती...
ती बिचारी एक बस बदलून सिक्स सिटर करून यायची.
मध्यवर्ती ठरलेलं ठिकाण. लॉ कॉलेजचा कॅम्पस. बाहेरच असलेलं कॉफी शॉप. साधारण संध्याकाळी रोज अर्धा तास. तोच अर्धा तास जणू दिवसभर भेटल्याचा आनंद द्यायचा. रविवारी मात्र काहीतरी कारण काढून किमान दोन तीन तास तरी भेटणं व्हायचंच.
रोजचा दिवस एक नवीन आनंद, नवीन अनुभव आणि एक नवीन story.
"ओळखलं का मी..."
ह्या एका वाक्यात त्या दोन वर्षांतल्या २×३६५ stories झर्रकन डोळ्यासमोरून तरळून गेल्या. आणि मग त्यानंतर मागील वर्षांमधले कित्येक अंधारमय बोगदे आठवले...
अर्थात जीवनातल्या खडबडीत रस्त्यावरून किंवा हायवे वरून जाताना किंमत ही मोजवीच लागते. खडबडीत रस्ता तुमच्या शरीराची आणि वेळेची झीज करतो..तर हायवे वरचे टोल तुमचे खिसे झिजवतात.
"अगं नंबर डिलीट केलाय...आठवणी नाही"
क्षणभर दोघांना जणू फक्त dialer tone ऐकू आला..
तीच्या नेहमीच्याच लाडीक घुश्श्यात
"त्या कश्या डिलीट करशील आणि त्या होणारही नाहीत. आपल्या दोघांच्या Hard Disc च्या 'झीरो सेक्टर' ड्राईव्ह वर Save झाल्यात त्या कायमच्या. Copy Paste तर करताच येणार नाहीत कुठे आणि Retrive म्हणशील तर अशक्य"
एक पॉज घेऊन...ती
"दोघांचा CPU (computer) सकाळी Reboot केला की पहिल्यांदा Scan 'झीरो सेक्टर' होतो आणि मगच पुढचे c d e f drive सुरू होतात. अर्थात तो 'झीरो सेक्टर' हा computer चा दैनंदिन working साठी किती महत्वाचा आहे हे तुझ्या माझ्यासारख्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला सांगायची गरज नाही"
माझ्या डोळ्यात तिचे अश्रू तरळले होते. मला मगाच च्या माझ्याच छदमी हास्याची लाज वाटली.
"आजही सखे तूच जिंकलीस , नेहमीप्रमाणे मला न हरवता"
पुढे औपचारिक संवाद झाला. तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय. मुलं फॅमिली काय करतात वगैरे.
दोघांचं c d e f सगळे ड्राईव्ह शेअर केले गेले. नंतर तेच ते आपलं नेहमीचं with family lunch/dinner ला भेटू वगैरे म्हणून Data transfer झाला.
"Ok bye..."
" Byeee..Byeee."
तिचा नेहमीच्या सवयीचा दोनवेळा लाँग बाय ऐकला आणि त्या दिवशीचा Computer मी Sleep mode वर टाकला.
- मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
ता. क.
हा संवाद काल्पनिक असून, कोणतेही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.


Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि