Skip to main content

नव्वदीच्या Dolby वाल्या म्हणी आणि आम्ही...

"हार कर जीतने वाले को बाजीगर कहैते है"। हया एका वाक्यामुळे आमच्या सारखे average 70% वाले सुध्दा स्वतःला extra ordinary समजू लागले..Thanks SRK
"Friendship मै नो sorry नो thank you" 
हे वाक्य धतींग करत म्हणता यावे म्हणून college canteen मध्ये चहा वडापाव पार्ट्या देउन, उधार्या झाल्या आमच्या..
पण आमचे भाग्य(श्री) कधीच उजळले नाही...
"जुते दे दो पैसे ले लो"....
ह्या गाण्यानंतर तर उगाच सगळ्याच लग्नात बूट लपवण्याचा shot सुरु झाला....आणि हम आप के है कौन म्हणत..आमच्या सारख्या मी मराठी वाल्यांनी जीजू शब्दाचे चींगम केले..
"मर गया राहुल".....
आमच्या college canteen मधे मग सचिन, सतीश, विकास वगैरे सगळेच राहुल.. गांधी नोट खर्च करु लागले...
खरंच आता वाटतयं वय तर पागल है।
"बडे बडे शहरो मै छोटी छोटी बाते होती रहती है"....
Engineering second year M3 down, मग काय आपण टाकला हा डायलॉग ताईसमोर, बाबांनी मागून येउन जोरात मारलेली टप्पल अजून याद आती है।
नंतर बर्याच वर्षांनी RRआबांना पण अनुभव आला.. पत्रकार खुर्ची ले जाएंगे...
१४ फेब्रुवारी आणि पोर्णिमा एकाच दिवशी आले कि तो आमच्या सारख्या friendship to loveship वाल्यांसाठी साडेतीन मुहूर्त पैकी ऐक असतो म्हणे......
Thanks YRF
नवीन लग्न झालेल्या शेजारच्या मराठी काकू अचानक "करवा चौथ" साठी तुळशी बागेतून खास चाळण घेउन आल्या...
त्या दिवशी काकांना हम दिल दे चुके मधला सलमान झाल्या सारखे वाटलं..
असो..
पण खरंच DDLJ मधल्या अमरीश पुरींच्या खर्ज्या आवाजतल्या "जा सिम्रन जा.. जी ले अपनी जिंदगी" सारखे आम्ही त्याकाळी स्वप्नवत मनमुराद जगलो
Thanks Bollywood
---मिलिंद स$बुध्दे

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि