Skip to main content

पुण्यात "दिक्षित Diet".......सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची

सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची यथेच्छ चुळ भरली दुकानासमोर. एकदम जोरात सुरुच झाला.. "धक धक करने लगा। ओ मोरा जियारा डरने लगा । संज्या, अन्या छोड ना तू दीक्षित की माधुरी बोल ना..."
अरे पक्या काय बे हे नवीन खुळ..
विक्या तु वाचलं का..भावा पुण्यात माधुरी उभी रहणार २०१९ ला...
च्यायला विकी हे म्हणजे दुधात रम घालून प्यायलेल्या त्या घाणेकर पेग सारखं रे... एकदम कडडेक...
परत कोणी विचारलं तर मानेला झटका दिला आणि म्हटलं "उस्मे क्या है" कि झालं.
मला आत्ताच कसं कसं होतं लेका. ती प्रचारासाठी पुण्यात सभा घेणार. प्रभात फेऱ्या सांज फेऱ्या दुपार फेऱ्या मारणार वेगवेगळ्या प्रचारफेऱ्या मारणार. साला जिची एक झलक मिळावी यासाठी आपण कित्येक मुंबई ट्रिप मारल्या. ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर तीच्या पिक्चरच्या गप्पांवर वील्सची पाकिटं संपवली. गुडलकच्या त्या कासिमशेटच्या चहाच्या उधार्या केल्या आणि जिंदगीभर झुरलो ती. ती माधुरी साक्षात आपल्याच शहरात आपल्याला जवळून दिसणार.
मानलं भावा आपण ह्या दाढीवाल्या जोडीला. काय खेळी केलीय.. चित भी मेरी पट भी मेरी.
आता हया मॅडम उभा राहिल्यावर खुद्द विरोधी पक्षाचा उमेदवार पण माधुरी म्हणलं की स्वतः तिलाच मतदान करणार मग कार्यकर्त्यांचा काय घेऊन बसलाय.
नदी किनारा मेट्रो कामामुळे जो गचाळ झाला आहे तो एकदम नवतरुण आणि नवीन पालवी फुटल्यासारखा तिच्या सभेने भरुन जाणार. बहुतेक आत्तापर्यंतच्या पुण्यातल्या सभांचे सर्व रेकॉर्ड मोडणार आहाहा...
तसंही आपल्या देशात माणूस आणि कामं बघून कोण मतदान करतो. तसं असतं तर कित्येक जण कायम कार्यकर्तेच राहिले असते. मागच्या वेळी नाही का त्या ओम नमामिच्या सुनामी लाटेमध्ये कित्येक लोकांनी आंघोळ करून घेतली.
तीच नक्की निवडून येणार बघ तु.
आपला चीची गोविंदा जर (श्री)रामाला मुंबईमध्ये धारातीर्थी करू शकतो तर..ही तर साक्षात अप्सरा "मेनका" तिच्यापुढे भलेभले "विश्वामित्र" गळून पडतील. आणि तसंही तिच्याजवळ स्वतःचे हक्काचे "श्रीराम" आहेतच आशीर्वाद द्यायला.
अजून एक बरं का होइल ती आली तर, शहरातल्या विविध फ्लेक्सवर तिचे सुंदर फोटो फ्लेक्सवर पुढील पाच वर्षे झळकतील आणि आपल्याला रोज नव्याने बघायला मिळतील. अधून मधून आपल्या रोजच्या पुणे वर्तमान पेपरमधे तिच्या बातम्या, येथील विविध उद्घाटनं, संमेलनं, जाहीर कार्यक्रम यानिमित्ताने तिला सारखं पुण्यात बघायला मिळेल.
नाही तरीही नेहमीच्या "तर तराट" चेहर्यापेक्षा ही अस्सल साजुक वाइन बरी नाही का?
परत दीक्षित असल्यामुळे पुणेरी पुणेकरांची मान दोन इंच अजुन वर जाईल. एक ते चार ऐवजी बारा ते पाच दुकान बंद ठेवतील हे पुणेकर.
त्या जगन्नाथ दिक्षिताचं नाही पण हे दीक्षित डायट्स पुण्याच्या पुणेकरांना नक्कीच वेड लागेल बघ.
हा आता काही लोकांना थोडा त्रास होईल आत्तापासूनच. मिसळवाले बापट यांना दीक्षित डायटनं आपला व्यवसाय बंद पडणार की काय ही भीती सतावायला लागलीय. तर तिकडे कार्तिकातल्या "काकड" आरत्या मध्ये भाकरी वरचे लोणी नाहीसं झालं म्हणे. आणि हो डेक्कनवर विविध हॉटेल्स रेस्टॉरंट्स बंद पडणार की काय यामुळे मालक चिंतेत आहेत, की आपलं दुकान चालू राहणार की पुढच्या खेपेला बंद पडणार.
गावठाणात मात्र "घड्याळावर" विविध "हातांनी" जोरदार गजर लावायला सुरुवात केली म्हणे. त्यातले तर प्रत्येक जण शाहरुख होण्याचा तयारीत आहेत. कारण हरणार हे नक्की. पण मग "हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते है" हा डायलॉग म्हणायला मोकळे.
हाहाहा...जाम खुष आहे बघ आज मी. आज बबनला म्हणाव कटींगच्या ऐवजी दोन कडक कॉफी.. आणि हो..आज की कॉफी अपनी तरफसे बिडू.....
कॉफी पितांना विक्या म्हणाला..."पक्या
शेवटी आपल्याला काय फरक पडतो रे भाड्या. सिंहासन मधल्या त्या डायलॉग सारखे दाभाडे आले काय किंवा शिंदे आपली हजामत का सुटणारे. आपल्या जीवनात काही फरक पडणार आहे का"
"तसंच दीक्षित आले काय किंवा आणखी कोणी, पीएमटी थोडीच सुधारणा रे, ना हे ट्राफिक कमी होणार आहे आणि पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का ? रस्ते चांगले होणार आहेत का, की फुटपाथ मोकळा श्वास घेणार आहेत...सर्व जैसे थे च राहील.."
"तेव्हा ह्या दिक्षीत डाएटनी पुण्याचा डाएबेटीस काही बरा होणार नाही लेका..."
-----मिलिंद सहस्रबुद्धे ©

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि