Skip to main content

पुण्यात "दिक्षित Diet".......सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची

सकाळी सकाळी पक्या गैरज वर आला. नेहमीप्रमाणे माठातलं ग्लासभर पाणी घेतलं आणि तोंडातल्या माव्याची यथेच्छ चुळ भरली दुकानासमोर. एकदम जोरात सुरुच झाला.. "धक धक करने लगा। ओ मोरा जियारा डरने लगा । संज्या, अन्या छोड ना तू दीक्षित की माधुरी बोल ना..."
अरे पक्या काय बे हे नवीन खुळ..
विक्या तु वाचलं का..भावा पुण्यात माधुरी उभी रहणार २०१९ ला...
च्यायला विकी हे म्हणजे दुधात रम घालून प्यायलेल्या त्या घाणेकर पेग सारखं रे... एकदम कडडेक...
परत कोणी विचारलं तर मानेला झटका दिला आणि म्हटलं "उस्मे क्या है" कि झालं.
मला आत्ताच कसं कसं होतं लेका. ती प्रचारासाठी पुण्यात सभा घेणार. प्रभात फेऱ्या सांज फेऱ्या दुपार फेऱ्या मारणार वेगवेगळ्या प्रचारफेऱ्या मारणार. साला जिची एक झलक मिळावी यासाठी आपण कित्येक मुंबई ट्रिप मारल्या. ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर तीच्या पिक्चरच्या गप्पांवर वील्सची पाकिटं संपवली. गुडलकच्या त्या कासिमशेटच्या चहाच्या उधार्या केल्या आणि जिंदगीभर झुरलो ती. ती माधुरी साक्षात आपल्याच शहरात आपल्याला जवळून दिसणार.
मानलं भावा आपण ह्या दाढीवाल्या जोडीला. काय खेळी केलीय.. चित भी मेरी पट भी मेरी.
आता हया मॅडम उभा राहिल्यावर खुद्द विरोधी पक्षाचा उमेदवार पण माधुरी म्हणलं की स्वतः तिलाच मतदान करणार मग कार्यकर्त्यांचा काय घेऊन बसलाय.
नदी किनारा मेट्रो कामामुळे जो गचाळ झाला आहे तो एकदम नवतरुण आणि नवीन पालवी फुटल्यासारखा तिच्या सभेने भरुन जाणार. बहुतेक आत्तापर्यंतच्या पुण्यातल्या सभांचे सर्व रेकॉर्ड मोडणार आहाहा...
तसंही आपल्या देशात माणूस आणि कामं बघून कोण मतदान करतो. तसं असतं तर कित्येक जण कायम कार्यकर्तेच राहिले असते. मागच्या वेळी नाही का त्या ओम नमामिच्या सुनामी लाटेमध्ये कित्येक लोकांनी आंघोळ करून घेतली.
तीच नक्की निवडून येणार बघ तु.
आपला चीची गोविंदा जर (श्री)रामाला मुंबईमध्ये धारातीर्थी करू शकतो तर..ही तर साक्षात अप्सरा "मेनका" तिच्यापुढे भलेभले "विश्वामित्र" गळून पडतील. आणि तसंही तिच्याजवळ स्वतःचे हक्काचे "श्रीराम" आहेतच आशीर्वाद द्यायला.
अजून एक बरं का होइल ती आली तर, शहरातल्या विविध फ्लेक्सवर तिचे सुंदर फोटो फ्लेक्सवर पुढील पाच वर्षे झळकतील आणि आपल्याला रोज नव्याने बघायला मिळतील. अधून मधून आपल्या रोजच्या पुणे वर्तमान पेपरमधे तिच्या बातम्या, येथील विविध उद्घाटनं, संमेलनं, जाहीर कार्यक्रम यानिमित्ताने तिला सारखं पुण्यात बघायला मिळेल.
नाही तरीही नेहमीच्या "तर तराट" चेहर्यापेक्षा ही अस्सल साजुक वाइन बरी नाही का?
परत दीक्षित असल्यामुळे पुणेरी पुणेकरांची मान दोन इंच अजुन वर जाईल. एक ते चार ऐवजी बारा ते पाच दुकान बंद ठेवतील हे पुणेकर.
त्या जगन्नाथ दिक्षिताचं नाही पण हे दीक्षित डायट्स पुण्याच्या पुणेकरांना नक्कीच वेड लागेल बघ.
हा आता काही लोकांना थोडा त्रास होईल आत्तापासूनच. मिसळवाले बापट यांना दीक्षित डायटनं आपला व्यवसाय बंद पडणार की काय ही भीती सतावायला लागलीय. तर तिकडे कार्तिकातल्या "काकड" आरत्या मध्ये भाकरी वरचे लोणी नाहीसं झालं म्हणे. आणि हो डेक्कनवर विविध हॉटेल्स रेस्टॉरंट्स बंद पडणार की काय यामुळे मालक चिंतेत आहेत, की आपलं दुकान चालू राहणार की पुढच्या खेपेला बंद पडणार.
गावठाणात मात्र "घड्याळावर" विविध "हातांनी" जोरदार गजर लावायला सुरुवात केली म्हणे. त्यातले तर प्रत्येक जण शाहरुख होण्याचा तयारीत आहेत. कारण हरणार हे नक्की. पण मग "हारकर भी जितने वाले को बाजीगर कहते है" हा डायलॉग म्हणायला मोकळे.
हाहाहा...जाम खुष आहे बघ आज मी. आज बबनला म्हणाव कटींगच्या ऐवजी दोन कडक कॉफी.. आणि हो..आज की कॉफी अपनी तरफसे बिडू.....
कॉफी पितांना विक्या म्हणाला..."पक्या
शेवटी आपल्याला काय फरक पडतो रे भाड्या. सिंहासन मधल्या त्या डायलॉग सारखे दाभाडे आले काय किंवा शिंदे आपली हजामत का सुटणारे. आपल्या जीवनात काही फरक पडणार आहे का"
"तसंच दीक्षित आले काय किंवा आणखी कोणी, पीएमटी थोडीच सुधारणा रे, ना हे ट्राफिक कमी होणार आहे आणि पाण्याचा प्रश्न सुटणार आहे का ? रस्ते चांगले होणार आहेत का, की फुटपाथ मोकळा श्वास घेणार आहेत...सर्व जैसे थे च राहील.."
"तेव्हा ह्या दिक्षीत डाएटनी पुण्याचा डाएबेटीस काही बरा होणार नाही लेका..."
-----मिलिंद सहस्रबुद्धे ©

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...