Skip to main content

सहज सुचलेलं..आमचे सुपुत्र जोरात ओरडले.. मी आत बेडरूम मधे होतो " बाबा लवकर या नाना चा नवीन पिक्चर येतोय" ('नानाचा', जणू

आमचे सुपुत्र जोरात ओरडले.. मी आत बेडरूम मधे होतो " बाबा लवकर या नाना चा नवीन पिक्चर येतोय" ('नानाचा', जणू नाना सोसायटी तला ह्याचा मित्रच) "आपला मानूस". मी आतूनच म्हणालो मानूस नाही रे माणूस.
आजच त्याचा मराठी चा पेपर मिळाला होता. माझा मुलगा चौथीत आहे, अर्थातच इंग्रजी मिडीयम स्कूल. पुढे जाउन तीच व्यवहारी भाषा महत्त्वाची वैगेरे वैगेरे (स्वतः चे मानसिक समाधान) म्हणून इंग्रजी मिडीयम मधे टाकले. त्याच्या पेपरातील मराठी तल्या चुका पाहून उर भरून आला (उपहासाने) की अरे हा आपल्याच मुलाचा पेपर आहे ना? उदा. भेटकारड , चितर काढन्यात मगन होता, पोशण करते, गाडी धुतोय....
खरं च चौथीत मी शाळेत असतांना मराठीत ह्या अशा चुका होत नव्हत्या. अर्थातच मुलाची चुक कमीच आहे. आपली मराठी भाषा जीला आपण आपली मायबोली मायमराठी म्हणतो तीचे नवीन पीढितील हे स्वरुप पाहून जरा वाईट च वाटले. पुन्हा हा मराठी विषय नुसता अभ्यासाला, त्या पेपराला मार्क नाहीत. म्हणजे मुलांना आपोआपच त्या बद्दल प्रेम किंवा जाणीव नाही. पालकपण म्हणतात बोलता येतयना! (येते आहे ना!) लिहायला कुठे लागणारे पुढे?
आतातर cosmopolitan युगात मराठी, हिंदी, गुजराती.. इ. भाषा फक्त English मधे बोलताना शब्द आठवला नाही तर Filler म्हणून च वापरतात.
हि आपली "प्रगती" बघता कदाचित पुढील २५ वर्षात मराठी भाषा हि देखील पाली , मोडी सारखी इतिहास संशोधन मंडळ अथवा भारतीय पुरातत्व खात्यात जतन केलेली म्हणून होउन बसेल.
उगाच भावनिकता नाही पण कुठं तरी मनात खुपच वाईट वाटले. "मोत्या सारखं एकटाकी अक्षर आहे तुमचं" हे वाक्य बहुतेक कधीच कोणाला ऐकू येणार नाही. शाळतले मराठी चे श्री. परचुरे सर आठवले. अक्षर सुधारण्यासाठी लावलेला श्री. खेर सरांचा क्लास आठवला.
"काय हे कुत्र्या मांजराचे पाय काढलेत, काही च समजत नाही ये, पत्र नीट लिही जरा" आईचे शब्द कानात घुमलेले आठवले.
आपल्या मराठी भाषेसाठी एका पिढीतच आपण "कुठुन...कुठपर्यंत" आलो ह्याची खंत वाटू लागली.
साहेबाची भाषा अजूनही जगावर राज्य करते, आपण येनकेनप्रकारेण अजुनही गुलाम च आहोत
मग पुढे काय, बदल घडवायला लागेल, उपाय तर करावेच लागतील. अर्थातच उपाय हे घरगुती करावे लागतील, कारण शाळा तर इंग्रजी आहे.
सर्वांनी मिळून आपल्या परीने जेवढे काही प्रयत्न होतील ते नक्की करा. मराठी लिहणे, वाचणे आणि बोलणे हयात आपल्या मुलांना Distinction नाही पण किमान First class तरी नक्की मिळेल ह्याची काळजी घ्या।
आणि हो पिक्चर चे नाव "आपला मानूस" च आहे, मला उगाच वाटले कि मुलाने मराठी लिहताना जशी चुक करतो तशीच बोलताना ही केली कि काय....
विचार आवडला तर नक्की Forward करा....नावासकटची अट नाही कारण नाव नाही तर विचार महत्त्वाचा।
मिलिंद सबुध्दे..
३१/०१/२०१८

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि