Skip to main content

सहज सुचलेलं..आमचे सुपुत्र जोरात ओरडले.. मी आत बेडरूम मधे होतो " बाबा लवकर या नाना चा नवीन पिक्चर येतोय" ('नानाचा', जणू

आमचे सुपुत्र जोरात ओरडले.. मी आत बेडरूम मधे होतो " बाबा लवकर या नाना चा नवीन पिक्चर येतोय" ('नानाचा', जणू नाना सोसायटी तला ह्याचा मित्रच) "आपला मानूस". मी आतूनच म्हणालो मानूस नाही रे माणूस.
आजच त्याचा मराठी चा पेपर मिळाला होता. माझा मुलगा चौथीत आहे, अर्थातच इंग्रजी मिडीयम स्कूल. पुढे जाउन तीच व्यवहारी भाषा महत्त्वाची वैगेरे वैगेरे (स्वतः चे मानसिक समाधान) म्हणून इंग्रजी मिडीयम मधे टाकले. त्याच्या पेपरातील मराठी तल्या चुका पाहून उर भरून आला (उपहासाने) की अरे हा आपल्याच मुलाचा पेपर आहे ना? उदा. भेटकारड , चितर काढन्यात मगन होता, पोशण करते, गाडी धुतोय....
खरं च चौथीत मी शाळेत असतांना मराठीत ह्या अशा चुका होत नव्हत्या. अर्थातच मुलाची चुक कमीच आहे. आपली मराठी भाषा जीला आपण आपली मायबोली मायमराठी म्हणतो तीचे नवीन पीढितील हे स्वरुप पाहून जरा वाईट च वाटले. पुन्हा हा मराठी विषय नुसता अभ्यासाला, त्या पेपराला मार्क नाहीत. म्हणजे मुलांना आपोआपच त्या बद्दल प्रेम किंवा जाणीव नाही. पालकपण म्हणतात बोलता येतयना! (येते आहे ना!) लिहायला कुठे लागणारे पुढे?
आतातर cosmopolitan युगात मराठी, हिंदी, गुजराती.. इ. भाषा फक्त English मधे बोलताना शब्द आठवला नाही तर Filler म्हणून च वापरतात.
हि आपली "प्रगती" बघता कदाचित पुढील २५ वर्षात मराठी भाषा हि देखील पाली , मोडी सारखी इतिहास संशोधन मंडळ अथवा भारतीय पुरातत्व खात्यात जतन केलेली म्हणून होउन बसेल.
उगाच भावनिकता नाही पण कुठं तरी मनात खुपच वाईट वाटले. "मोत्या सारखं एकटाकी अक्षर आहे तुमचं" हे वाक्य बहुतेक कधीच कोणाला ऐकू येणार नाही. शाळतले मराठी चे श्री. परचुरे सर आठवले. अक्षर सुधारण्यासाठी लावलेला श्री. खेर सरांचा क्लास आठवला.
"काय हे कुत्र्या मांजराचे पाय काढलेत, काही च समजत नाही ये, पत्र नीट लिही जरा" आईचे शब्द कानात घुमलेले आठवले.
आपल्या मराठी भाषेसाठी एका पिढीतच आपण "कुठुन...कुठपर्यंत" आलो ह्याची खंत वाटू लागली.
साहेबाची भाषा अजूनही जगावर राज्य करते, आपण येनकेनप्रकारेण अजुनही गुलाम च आहोत
मग पुढे काय, बदल घडवायला लागेल, उपाय तर करावेच लागतील. अर्थातच उपाय हे घरगुती करावे लागतील, कारण शाळा तर इंग्रजी आहे.
सर्वांनी मिळून आपल्या परीने जेवढे काही प्रयत्न होतील ते नक्की करा. मराठी लिहणे, वाचणे आणि बोलणे हयात आपल्या मुलांना Distinction नाही पण किमान First class तरी नक्की मिळेल ह्याची काळजी घ्या।
आणि हो पिक्चर चे नाव "आपला मानूस" च आहे, मला उगाच वाटले कि मुलाने मराठी लिहताना जशी चुक करतो तशीच बोलताना ही केली कि काय....
विचार आवडला तर नक्की Forward करा....नावासकटची अट नाही कारण नाव नाही तर विचार महत्त्वाचा।
मिलिंद सबुध्दे..
३१/०१/२०१८

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

१९९२ चे अमिताभ बच्चन

 १९९२ चे अमिताभ बच्चन  पुण्यातील बाजीराव रोडवरील महत्त्वाची खूण म्हणजे आमची नूमवि मुलांची शाळा होय. रस्त्यावरील शाळेच्या कमानीतून आत गेल्यावर लागतं ते एक भलं मोठं इथून-तिथून पसरलेले आडवं प्रवेशद्वार. साधारण पाच-सहा फूट उंचीचं हे गेट कायम लक्षात राहिलं. मधल्या सुट्टीत शाळेतून पळून जाताना ह्याच्यावरुनच उडी मारावी लागायची. मोठ्या सुट्टीत मुख्य प्रवेशद्वार बंद असायचं आणि आम्ही उजव्या किंवा डाव्या बाजूने असलेल्या छोट्या दरवाजातून ये-जा करत असू. शाळेच्या बाहेर जाण्याची मुख्य आकर्षण म्हणजे चिंच आणि पेरूची गाडी, लाल पांढऱ्या गोळ्या विकणारा तो लेंगा-टोपीवाला म्हातार बाबा. ५० पैशात मिळणारी पावभाजी आणि २५ पैशात मिळणारी भेळ. आहाहा! त्या सगळ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळत आहे.  प्रवेशद्वाराच्या मधोमध उभा राहिलं आणि समोर पाहिलं की शाळा म्हणजे अक्षरशः भव्य राजवाडा वाटतो. दोन्ही बाजूंनी काळ्या दगडात बांधलेली तीन मजली कौलारू भक्कम इमारत. ह्या सलग दोन्ही बाजूच्या इमारती जिथे एकत्र होतात ते मोठं प्रशस्त सभागृह. ह्याच सभागृहात दरवर्षी स्नेहसंमेलनातील गाजणारे कार्यक्रम म्हणजे, परचुरे सरां...

"साय"कल

  "साय"कल "तुम्ही कधी प्रेमात पडलात का?" "तुम्ही कधी सायकलवरुन पडलात का? ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठामपणे "हो" अशी देताना प्रत्येक जणांच्या डोळ्यात दिसणारी चमक एक सारखीच असते. सायकल वरून पडणे ही एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट असते. "सायकलवरून पडल्यावरच सायकल येते" हा सुविचार "शास्त्र असतं ते" सारखा आहे. सायकल शिकणे आणि शिकवणे ह्या दोन विरुद्ध टोकाच्या कला आहेत. जेव्हा आपण सायकल शिकत असतो, तेव्हा समोर आलेला प्रत्येक जण, प्रत्येक गोष्ट आपल्याला मोठ्या रा‌क्षसी संकटासारखी भासते. खरंतर पुढील आयुष्यात त्याहूनही अनेक समस्या, विघ्ने येतात. पण शिकतांना साधं छोटं कुत्रं असेल किंवा मोठी गाडी, समोर आल्यावर भासणारी ती भीती म्हणजे 'या सम हीच' अशी असते. मात्र हेच आपण सायकल शिकवत असतो तेव्हा "अरे किंवा अगं का थांबलीस, उगाच घाबरतेस, साधी स्कूटर तर होती!" अश्या समोरच्याला किरकोळीत काढणार्या वाक्यांची पेरणी चालू असते. आपण स्वतः शिकताना कधीच Hopping ने सुरुवात करत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली सायकल सुरुवात ही बिन द...

दादा परत या..

  दादा परत या.. "मी कोणाच्या बापालाही घाबरत नाही" असं तुमच्या कडक आवाजात ऐकताना पुन्हा पुन्हा तुमची उणीव भासते. तुमच्याकडून चुकून बोली भाषेतील शब्दांची उठाठेव कधीतरी झालीही असेल. परंतु संस्कृतीच्या मर्यादा मग त्या राजकीय असतील अथवा सामाजिक तुम्ही कधीही ओलांडल्या नाहीत. कोणा एखाद्यावर उगाच खालच्या भाषेत टीकाटिप्पणी केली नाहीत. तर कधी सत्तेच्या गुर्मीत कोणाची निंदा नालस्ती केल्याचं आठवत नाही. तुमचा बाज आणि दरारा वेगळाच होता आणि आहे. प्रशासनावरची पकड म्हणजे जणू बापाने रस्ता ओलांडताना मुलाचा धरलेला घट्ट हात. धरलेल्या त्या हातात काळजी ही असतेच पण तेवढाच धाक असतो. तशी तुमची प्रशासनावरची पकड आहे. आमच्या पुण्याच्या पालकमंत्री पदी असताना तुमचा आठवड्याला किंवा महिनाभरातील एखादा दौरा ठरलेलाच. हा दौरा म्हणजे साध्या शिपायापासून ते मुख्य आयुक्त पर्यंत एक भीती असायची. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यापासून ते अगदी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलीसापर्यंत "दादा आज पुण्यात येणार" हे आधी दोन दिवसापासूनच चर्चेत असायचे. तुम्ही ज्या दिवशी येणार त्या दिवशी सकाळी सात ते रात्री दहापर...