Skip to main content

गुंतवणूक

 गुंतवणूक

सध्याच्या घडीला सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे गुंतवणूक.
सीन वन...
आमच्या सोसायटीतील शेजारच्या C विंगमधील साठे आजोबा रिटायर होऊन साधारण १२-१५ वर्ष झाली असतील. मोठ्या सहकारी क्षेत्रातील खात्यात बऱ्यापैकी मोठ्या पदावर होते. चांगले पेन्शन पदरात पाडून रिटायर झाले. दर महिन्याला पेन्शन बँकेत जमा होतं आणि मग साधारण पाच-सहा महिन्यांनी चांगली रक्कम अकाउंट वर जमा झाली की सुरू होते चलबिचल. आजोबांचं हे असं गुंतवणुकीचं विचार चक्र वर्षातून किमान दोनदा तीनदा तरी होतंच.
एकाच बँकेत सगळे पैसे नकोत. म्हणून मग पेन्शनची सरकारी, व्याजदर काहीश्याच टक्क्यांनी जास्त म्हणून एक सहकारी. तर दैनंदिन व्यवहार Ease of Banking सोप्पे जावेत म्हणून एक प्रायव्हेट, अश्या किमान तीन बँका. एकाच खात्यावर नकोत, म्हणून पेन्शन व्यतिरिक्त एक सेव्हींग खातं. ही एवढी सगळी खाती संभाळता सांभाळता मन वेगळ्याच विचारांनी खातं ते वेगळंच.
बँकेत काय सध्या व्याज मिळतंय? मग शेजारी राहणारा राहुल त्यांना सांगतो की आजोबा तुम्ही म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करा. कट्ट्यावरचे देशपांडे सारखे म्हणतात की सोन्यात गुंतवणूक चांगली. असा विषय निघाला की मेहता नेहमी म्हणतो पाच सहा मोठ्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे. कोणाचा तरी फोन येतो की आजोबा LIC एकदम सेफ आहे, तर कोणी म्हणतं एखाद्या रियल इस्टेटमध्ये टाका. अजून काय काय सल्ले येतच असतात पण "मना जोगी" गुंतवणूक काही कुठे होत नाही.
साठे आजोबा असंच एक दिवस त्यांची गुंतवणुकीची फाईल चाळत होते. जुन्या केलेल्या एफडी सर्टिफिकेट्स, पोस्टाचं पासबुक, किसान विकास पत्र वगैरे.
त्यांच्या मनात सहज विचार चमकून गेला.
"काय आहे ना ३०-४० वर्षांपूर्वी पोस्ट, बॅंका, एलआयसी हे सर्व जणू कुबेर होते. RD FD वर तेव्हा असे काही गब्बर Interest Rates होते. तेव्हा असं वाटायचं की आपल्याकडे पाच-दहा लाख पाहिजे होते रे! मस्त पैकी बँकेत ठेवून नुसतं व्याजावर बसून खाल्लं असतं. आज बघा असं झालंय की मस पंचवीस तीस लाख आहेत पण आज बँकांचे आणि इतर पोस्ट व्याजदर काश्मीरच्या थंडीत जसा पारा शून्याच्या जवळ जातो तसे झाले आहेत. नुसतं व्याजावर तेव्हा पण बसून खाता आलं नाही आणि आता एवढे मुद्दल असूनही निवांत बसून खाता येत नाही."
कट, सीन टू...
आजोबांच्याच शेजारी राहणारा राहुल आणि त्याच्या सारखे चाळीशीतील तरुणाईची व्यथा थोड्याफार प्रमाणात अशीच बरं का!
शिक्षणानंतर पहिली काही वर्ष लग्न, नवीन घर, उत्साहाने घेतलेली चार चाकी. घराचे आणि गाडीचे हप्ते भरण्यात उमेदीची १२-१५ वर्षे गेली. त्यामुळे तेव्हा थोडं थोडं जमा करून Investment करू (नवी पिढी म्हणून गुंतवणूक नाही Investment) तर ते जमलं नाही. म्युचल फंडाच्या एसआयपी किंवा शेअर्स मध्ये फारसं काही करता आले नाही. आता वयाच्या मधल्या टप्प्यावर घराचे, गाडीचे हप्ते फेडले आहेत. दुसरी कोणतीही कर्जाची टांगती तलवार डोक्यावर नाही. अर्थिक सबलता आल्यामुळे मानसिक ताणतणाव नाही. पैसा बऱ्यापैकी हातात आहे आणि Investment करण्याची इच्छा आहे. पण Interest Rate सर्वत्र असे आहेत की बँक आणि पोस्ट Safe आहेत पण ह्यांच्यात Investement करण्यात Interest च राहिला नाही. अशावेळेस म्युचल फंड सारखे मार्ग नक्कीच आकर्षित करतात. त्या वाटांवर रंगीबेरंगी दुकान आहेत प्रलोभन आहेत परंतु आपण नेमकं जेव्हा त्या वाटेवर चालताना खड्ड्यात पडू तेव्हा कोणी उचलायला येईल याची शाश्वती नाही. कारण Mutual Funds are subjected to Market Risks. कोणीच गॅरंटी देत नाही. ही Investment म्हणजे सिनेमा सारखी आहे. एखादा फंड किंवा शेअर, सिनेमा सारखा कधी ब्लॉक बस्टर होईल हे सांगता येत नाही आणि मी मी म्हणणारे कधी गाळात जातील कळणार ही नाही. अर्थातच चित्रपट पंडित uncertain असले तरी फायनान्स पंडित नक्कीच माहिती पूर्ण अभ्यास करून योग्य सल्ला देऊ शकतात. परंतु "म्युचल फंड जोखीम के आधीन है" हा डिस्क्लेमर काही ते पुसू शकत नाहीत. अक्षय कुमारच्या गरम मसाला सिनेमांमध्ये एक डायलॉग आहे जो ह्या शेअर मार्केट मधील गुंतवणुकीला तंतोतंत लागू होतो. "जो लडकी हमे चाहीये उसे हम नही चाहिये (जो शेअर अथवा म्युचल फंड चांगले रिटर्न्स देतोय तो घ्यायची आपली कुवत नाही किंवा आपल्याला नेमकं कळत नाही) और हम जिस लडकी को चाहिये वो कैसे चाहिये (म्हणजे जिथे आपण गुंतवणूक करू तिथं रिटर्न्स मिळतीलच याची शाश्वती नाही, किंवा बर्याच वेळा मिळतच नाहीत)"
म्हणूनच लेखाच्या सुरुवातीला म्हटले होते त्याप्रमाणे नात्यांच्या गुंतागुंती पेक्षा अधिक गुंतागुंतीचा प्रश्न सध्या आर्थिक गुंतवणूक हा आहे.
"कारण प्रत्येक वेळेस काळ आणि वेळ एकमेकांना ओव्हरटेक करत आहेत.
जेव्हा वेळ चांगली होती, तेव्हाचा काळ बरोबर नव्हता आणि आता जेव्हा काळ बदलला आहे तेव्हा वेळ बरोबर नाही."
© मिलिंद सहस्रबुद्धे
सदाशिव पेठ पुणे ३०
०९/११/२०२२
ता. क.
सध्याच्या आभासी जगात कोणतीच गुंतवणूक शाश्वत नाही, ना नात्यांची ना पैशाची.




Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि