Skip to main content

हिमालयाची सावली

 हिमालयाची सावली




आपण आतल्या खोलीत असतो आणि बाहेर TV वर एखादी मालिका किंवा सिनेमा चालू असतो. त्यातील काही संवाद आपल्याला आत ऐकू येतात. आपण आतूनच "अगं, विक्रम गोखले ना? बघ बरोबर ओळखलं की नाही!"
अभिनया बरोबर आपल्या आवाजाचीही कडक ओळख असणाऱ्या मोजक्या अभिनेत्यां पैकी एक आवाज आज कायमचा हरपला.
पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई आणि वडील चंद्रकांत गोखले अशी अभिनयाची हिमाच्छादीत शिखरे. ह्या सर्वांना सलाम करणारं ह्याच कुळातले अभिनय क्षेत्रातील हिमशिखर
म्हणजे विक्रम गोखले.
बॅरिस्टर नाटकामधील गाउन घातलेला, तोंडात सिगारेटचा पाइप आणि हातात पुस्तक घेऊन करारी खरज्यात संवाद म्हणत त्याचा तो विशिष्ठ पौज घेणारा वकील
म्हणजे विक्रम गोखले.
अमिताभ बच्चन समोर अग्निपथ मधील कमिशनर गायतोंडे आणि खुदागवाहमध्ये जेलर रणवीरसिंगच्या भूमिकेत तेवढ्याच ताकदीने अभिनय साकारणारा अधिकारी..
सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेमात विघ्न आणणारा हम दिल दे चुके सनम मधील अस्खलित शास्त्रीय गायक पंडित दरबार
म्हणजे विक्रम गोखले.
लग्न संस्थेची मर्यादा ओलांडून ही आपला वाटणारा, कळत नकळत मधील मनोहर देसाई
निवडणुकीच्या राजकारणात उभी-आडवी, तिरपी कशीही चाल करु शकणारा वजीर -पुरषोत्तम कांबळे
म्हणजे विक्रम गोखले.
या सुखांनो या मधील डावीकडे वळून एका नजरेच्या कटाक्षाने आश्वासक संवाद साधणारे दादा अधिकारी
गाजलेल्या अग्निहोत्र मालिकेतील साकारलेला गुढ गंभीर मोरया
म्हणजे विक्रम गोखले.
साधारण १०० हून अधिक हिंदी-मराठी सिनेमात आपल्या अभिनयाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटविणारा हाडाचा सच्चा रंगकर्मी
म्हणजे विक्रम गोखले.
नाटक, सिनेमा आणि दूरदर्शन मालिका ह्या तिन्ही अभिनय क्षेत्रातील महानायक.
म्हणजे विक्रम गोखले.
सामाजिक कार्य आणि वडिलोपार्जित लाभलेली प्रखर देशभक्ती तेवढ्याच ताकदीने पुढे नेणारा सावरकरभक्त
म्हणजे विक्रम गोखले.
हिमालयाची सावली ही हिमालयाहून ही मोठी होऊ शकते हे दाखवून देणारा सुपुत्र
म्हणजे विक्रम गोखले.
बोलके डोळे, गोल चेहरा, गोरी कांती, सरळ नाक आणि करारीपणा उमटणारा चेहरा कायम लक्षात राहील.
विक्रम गोखलेजी तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
© मिलिंद सहस्रबुद्धे
२७/११/२०२२
सदाशिव पेठ पुणे ३०

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि