Skip to main content

सेन्सेक्स

 सेन्सेक्स

विचारांचे Bull कधी Dominate करतात तर आचारांचे Bear सेन्सेक्स खाली पाडतात. हे वर खाली होण्यात जो जीवंतपणा आहे ना त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे.

Sensex

गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य माणसाच्या ओठावर गुणगुणला जाणारा हा शब्द म्हणजे "सेन्सेक्स". रोजच्या दैनंदिन जीवनात तरुण वर्गापासून ते अगदी काठी टेकवत चालणार्या आजोबांपर्यंत एकदा तरी ज्याची आठवण काढतोच तो म्हणजे "सेन्सेक्स". "काय रे आज चढला का?" "का पडला?" ही दोन वाक्य प्रत्येकजण सध्या विचारतोच. तसं पाहिलं तर त्यावर काय रोजचे आयुष्य अवलंबून आहे तर अजिबात नाही. असं असून सुद्धा त्याचा एक चस्का लागला आहे सर्वांना.

मार्केट, म्युचल फंड, फंड मॅनेजर, डिविडंट, कैडल चार्ट यांसारखे न कळणारे शब्द संग्रह सुद्धा सगळेजण सध्या लीलया वापरू लागले आहेत. साध्या भाजीवाल्या पासून ते मुकेश अंबानी पर्यंत सगळेच. अर्थात 1992 साला नंतर आलेल्या Globalisation निर्णयाचे हे स्वागतार्ह दूरगामी परिणाम आहेत. नकळतच आज सेन्सेक्स, तुमच्या आमच्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय होऊन बसला आहे. असा हा सेन्सेक्स त्याच्याबद्दल एक उत्सुकता आहे एक अनाहूत अप्रूप देखील आहे.

आपल्या जीवनात देखील असे विविध सेन्सेक्स कार्यरत असतात. फरक इतकाच की त्यांना विशिष्ट वॉल स्ट्रीट किंवा दलाल स्ट्रीट नसतं. त्यांच्या चढ-उतारांचे आलेख नोंदवणारी कोणती संस्था नसते. हया सेन्सेक्स चे विक्रेते आपणच असतो, ब्रोकर आपणच असतो आणि ग्राहक पण आपणच.

आपल्या आयुष्यात विविध नात्यांचा एक सेन्सेक्स असतो. प्रत्येक नातं म्हणजे जणू घेतलेला किंवा लाभलेला एक शेअर आणि आपला स्वतःचा आयुष्याचा एक पोर्टफोलिओ. प्रत्येक नात्याचा एक भाव ठरवला जातो. अर्थातच "भाव" शब्द इथं भावना या स्वरूपात घ्या बर का. 

संबंध दृढ होत जातात अथवा कमी होत जातात तसा हा भाव कमी जास्त होत असतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर मुलांचा आई-वडिलांबरोबर असलेल्या नात्याचा सेन्सेक्स. लहानपणी हा 52 week high असतो आणि जसजसे वय वाढत जाते तसतसे पंचवीशीला हाच भाव जरा 52 week low झालेला असतो. आयुष्यभर ह्या नात्याचा सेन्सेक्स वरखाली असा होतच राहतोच. कालांतराने काहीजण तो मोडीत काढतात. पुढे जाऊन तो शेअरचज् Die Stock होउन जातो.  

आपल्या जीवनात देखील असंच आहे. आपल्याला मिळणारे मित्र-मैत्रिणी. भेटलेले विविध सहकारी, अचानक बागेत किंवा एखाद्या ट्रीपमध्ये झालेल्या ओळखी. एखाद्या कार्यक्रमानिमित्ताने जुळलेले ऋणानुबंध. अशा विविध अनुषंगाने आपल्या जीवनात विविध शेअर्सचा एक पोर्टफोलिओ तयार होतो. आपल्याच न कळत त्याचा एक विशिष्ट सेन्सेक्स कार्यरत असतो . हा सेन्सेक्स सुद्धा रोज कमी जास्त होत असतो. चांगल्या वाईट प्रसंगी हा सेन्सेक्स वर खाली होत राहतो. ह्यातले काही शेअर्स कधी 52 week high तर कधी 52 week low होत असतात. काही शेअर्स अचानक मधेच भेटून divident पण देतात. कधीतरी मध्येच काही कारणास्तव, अथवा काही कटूअनुभवामुळे आपण एखादा शेअर मोडीत पण काढतो. तर एखाद दोन शेअर आपल्या Portfolio मधे बरेच दिवस idle पडून असतात. अचानक एखाद्या प्रसंगाने तो एकदम वधारतो. त्या शेअरला आपण इतके दिवस जपून ठेवले याचा आपल्याला मनापासून आनंद होतो. एवढे दिवस जपून ठेवलेल्या शेअरनी आज आपल्याला नक्कीच मदत केली मग ते अडचणीचा काळ असेल किंवा आनंदाचा काळ असेल. 

एखादा शेअर असा असतो की जो अलगद भावनांनी जपलेला असतो. प्रत्येकाच्या जीवनात मार्केट कळायला लागल्या नंतर जणू घेतलेला पहीला शेअर. जीवनातील एखादा विशिष्ट काळात हयाचा भाव सर्वात उच्च असतो. त्यातून मिळालेला आनंद हा कालातीत असल्याने असा शेअर portfolio मध्ये पडून राहिला तरी त्याची किंमत ही आपण कधीच करत नाही. कारण तो आपल्यासाठी अनमोल मोतीच असतो. त्याला मोडीत काढण्याचे धैर्य आपल्याला कधीच होत नाही. आपण प्रेमात असतो कायमच त्याच्या.

जसे शेअर मार्केट सेन्सेक्स विविध अंतर्बाह्य घटनांनी वर-खाली होतं. Foriegn investment, तेलाचे दर, राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, शेतीचे भाव अथवा एखादा नैसर्गिक आपत्ती तसंच काहीसं आपल्या नात्यांचा सेन्सेक्स. तो सुद्धा विविध घटनांनी, अनुभवांनी तसेच केलेल्या कष्टांमुळे अथवा मिळालेल्या यशामुळे आणि त्यावर आपण केलेल्या सखोल विचार म्हणजे शेअर च्या भाषेत सांगायचं तर फंडामेंटल चा केलेला अभ्यास यामुळे वरखाली होत असतो.

रोजचं जीवनही एक सेन्सेक्सच आहे. विचारांचे Bull कधी Dominate करतात तर आचारांचे Bear सेन्सेक्स खाली पाडतात. हे वर खाली होण्यात जो जीवंतपणा आहे ना त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे. ह्रृदयाचा सेन्सेक्स ( ECG ) त्यामुळेच तर सतत नाडीची बेल वाजवत असतो. 

खरंच कोणी म्हणतं कि हे मार्केट हा सेन्सेक्स म्हणजे जुगार आहे...हो आहेच शेवटी जीवन पण एक मार्केट आहे आणि त्याचा सेन्सेक्स एक जुगार...

© मिलिंद सहस्रबुद्धे

११/०४/२०२१

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि