Skip to main content

"आणि सज्ञान होतांना.."

"आणि सज्ञान होतांना.."

पहिली एक दोन वर्ष सगळंच छान, गुडी गुडी असतं. नवीन असतं सगळंच. आजुबाजुचं वातावरण समजून घेणं, काही कळालं नाही तर विचारणं, मिळालं नाही तर हट्ट करणं. हट्ट पुरवणं आणि पुरवून घेणं. कसं छान निरगास असतं. थोडंसं काही झालं तरी लगेच रडू येणे, जराशी समजूत काढली की विसरून जाणं....

पुढे तिसर्या ते पाचव्या वर्षात बोलायला यायला लागतं.  एकमेकांचे शब्द समजतात.  मग एकमेकाशी बोलणं आणि एकमेकाला बोलणं दोन्ही सूरू होतं. थोडाफार अट्टाहास वाढतो. मी म्हणेन तेच खरं असं वागायला सुरुवात होते.

बघा ना जसं मुल जन्माला आल्यापासून त्याची वाढ होत असते तसंच काहीसं वैवाहिक जीवनाची सुरुवात आणि वाढ होत असते.

सहाव्या वर्षा नंतर मग ह्या दांपत्य जीवनाची
शाळा सुरु होते. दरवर्षी नवीन इयत्ता, नवीन निर्मिति, नवीन अनुभव, नवीन शिक्षण आणि असं बरंच काही. एकमेकांचे अभ्यास करत, रोज एक नवीन परीक्षा देत. ती कधी पास
तर कधी नापस होत पुढच्या वर्गात जाणं चालू असतं.

असं करत करत दहा बारा वर्ष सरतात आणि Thirteen मधलं Teen Age  (किशोर वय) येतं. जरा स्थिर स्थावर झालेलं, एकमेकाला बर्यापैकी समजलेलं आणि समजुन घेतेललं असतं. इथं पुन्हा नव्याने एक आपुलकी (affection) निर्माण होते. मुलांचं सांगोपन करता-करता एकमेकाशी संवाद पुन्हा नव्याने सुरु होतो. अशी कमी जादा संवादातून पुढची तीन वर्षे सरतात. 

मग येतो ह्या लग्नाचा १६वा वर्धापन दिन. (साधारण चाळीशीत) तेव्हा तर जणू वयात आल्या प्रमाणे नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडायला होतं. अर्थात हे प्रेमसुध्दा त्या 'सोळावं वरीस धोक्याचं' सारखंच असतं बरं का. कारण मागील पंधरा वर्षातलं सगळं काही विसरू शकत नाही ना माणूस. तसंच हे प्रेम सुद्धा काही काळापुरता त्या आळवा वरच्या पाण्यासारखंच असलं तरी, होतं मात्र नक्की.

असं हे वैवाहिक जीवनरुपी मुल जेव्हा १८ व्या वर्षात पदार्पण करतं तेव्हा सज्ञान झालेलं असतं. छोटी मोठी भांडणं, वाद सोडवले जात नाहीत तर ते आपोआप विरुन जातात आणि तात्काळ विसरले पण जातात.  एकमेकाला अजून स्पेस दिली जाते ... मागील  सतरा वर्षातल्या अनुभवांमुळे, कितीहि नवीन प्रसंग आले तरी शांततेने मार्ग काढले जातात.

महत्वाचं म्हणजे आता ह्या पुढे आपलं आपल्यालाच (एकमेकांना) सांभाळायचंय  ह्याची जाणीव होते.  इथूनच मग एकत्र ध्येयाने गध्देपंचवीशीकडे यशस्वी वाटचाल सुरू होते...

जशी आमची सुरु झालीय.....😀

© सहज'मित (मिलिंद सहस्रबुद्धे)
०७/०७/२०२०

 आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.
आपल्या सर्वांच्या भरघोस शुभेच्छांनी आणि आशीर्वादानी आमची फेसबुक भिंत काल भरुन गेली. 🙏🙏
with Tanmaya Sahasrabudhe
काल आमच्या लग्नाचा १७वा वर्धापनदिन साजरा झाला आणि आम्ही उभयतांनी १८व्या वर्षात पदार्पण केले. सज्ञान झालो. त्यानिमित्ताने नेहमी प्रमाणे सहज सुचलंच #सहज'मित..

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि