Skip to main content
सत्ते पे सत्ता (सत्त्यातर)

अमिताबच्चन..जी
सहस्त्रचंद्र दर्शनाच्या दिशेने वाटचालीसाठी शुभेच्छा...

जीवनातील पहिली दोन सोडली तर तब्बल पाच दशकं आपल्या अस्तित्वानं संपूर्ण भारताला आणि जगाला सुध्दा मंत्रमुग्ध करणारं व्यक्तीमत्व. तुमच्यावर लेख पुस्तक आणि बरंच काही लिहलं गेलयं, अजुनही लिहलं जातयं.  मोठ्या मोठ्या नामांकित व्यक्ती पासून ते अगदी कोपर्यावरचा बुट पॉलिशवालासुद्धा (त्याला पण तुम्ही स्वाभिमानीपणाची ओळ देउन अजरामर केलंत म्हणून)  लिहू शकतो. इतके आम्ही एकशे तीस करोड भारतीय अमिताबच्चनमय आहोत. म्हणूनच मीपण मांडतोय आज.

चाळीशी, पन्नाशी-साठीतले तर नक्कीच बच्चन बच्चन करतील पण अजूनही कौन बनेगा करोडपती बघतांना, तुमचं अस्तित्व इतकं भारावून टाकणारं आहे की अवघं पन्नास-साठ महीने वयाची पोरं टोरं पण बच्चन बच्चन करतात..काय ही जादू.. हे बघितल्यावर पटतं.."रीश्ते मे तो आप सब के बाप होते है...नाम है शहेनशहा"

अभिनेत्याच्या जीवनातील प्रत्येक चढ उतार आम्ही तुमच्याकडे पहात पहातच अनुभवलेत. जे एखाद्या सामान्य व्यक्तीच्या सुद्धा आयुष्यात येतात. अचानक झालेला मोठा अपघात, वैवाहिक जीवनातील गैरसमज, व्यवसाय क्षेत्रातील अपयश ते पार सिनेमा क्षेत्रात सर्वोच यश. तुम्ही वेगळे का असा प्रश्न पडला की तात्काळ उत्तर सापडते. ते म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला "साब, मै आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता"वाला तो विजयच दिसला कायम.

तुम्हाला पडद्यावर बघतांना प्रत्येकजण तो प्रसंग स्वतः जगतोय की काय इतका समरस होऊन जातो अजूनही. मग अगदी भावनिक, कौटुंबिक, दे मार मारामारी किंवा प्रणय असेल तुम्ही साकारलेल्या प्रत्येक पात्रात तुम्ही इतकी जान आणलीत की आम्हाला कधीच वाटलं नाही "हं..नौटंकी है साला'

आज ग्यारा दशकं झालीत तुम्हाला, तरीही आम्ही रोज सकाळी जलसा वर तुडुंब गर्दी करतो आणि पुन्हा पुन्हा तेच वाक्य जगतो "ग्यारा मुलको की पुलीस डॉन के पिछे है, लेकीन डॉन को पकडना मुश्किल......"

तुम्ही वयाच्या विविध टप्प्यावर व्यवसायीक ते समांतर सिनेमा केलात. अनुभवी ते नवतरुण दिग्दर्शकां बरोबर काम केलंत. सामाजिक परंपरेला छेद देणार्या भुमिका केल्यात, आणि साठी नतर वयाला साजेशा. हाच आदर्श ठेवून आता सर्वच नट मंडळी ते follow करतांना दिसतात. मग तुम्ही म्हणालात ते काय चूक "हम जहां खडे होते है, लाईन वहीसे शुरु होती है।"

नवरा बायको नात्यातील उंच सखलपणा तुम्ही अगदी सहजपणे आम्हाला दाखवून दिलात. पत्नी बद्दलचा अभिमान कसा असावा हे आपण उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर पडद्यावर गाऊन पण दाखवलंत "जिस की बीबि .....उसका भी बडा नाम है..।"

राजीव गांधी पासून , मुलायमसिंग ते आता नरेंद्र मोदीं पर्यंत तुम्हाला जेव्हा जेव्हा ह्या सर्वांनी भारतासाठी केलेलं समाजकारण राजकारण योग्य वाटलं तेव्हा तेव्हा समर्थन केलंत आणि आपला सहभाग नोंदवला. अश्या वेळेस आपल्यावर कधी कधी टोकाची टिका टिप्पणी झाली. तरीही तुम्ही दाखवून दिलंत "मुझे जो सही लगता है वो मै करता हुं. फिर वो चाहे भगवान के खिलाफ हो, कानून के खिलाफ हो या पुरे सिस्टीम के खिलाफ"

लिहीत बसलो तर कदाचित  मराठीच काय पण सर्वच भाषांमधील शब्द कमी पडतील. कारण तुम्हीच आम्हाला "और बंगाली मै कहते है..." म्हणत प्रेमाच्या अनेक भाषा शिकवल्यात. तुमच्या सारखा बहुभाषिक जगभरात शोधून सापडणार नाही. तुमच्या वाणीचा स्पर्श ज्या ज्या भाषेला झाला ती भाषा Global झाली.

जीवनाच्या प्रत्येक विषयावर, अनुभवांवर, प्रसंगांवर आपण आपल्या कारकिर्दीत केलेला स्पर्श आम्हाला सदैव दिशादर्शक ठरतो. आम्हा सर्वांसाठी तुम्ही समुद्राच्या मध्यात ठामपणे उभे असलेले लाइट हाऊस आहात.

असं म्हणतात की, काही ऋणांमधून कधीच बाहेर पडू नये कारण मग ते ऋणानुबंध लोप पावतात. तसे हे तुमचे कालातीत ऋणानुबंध आहेत आणि आम्ही भाग्यवान.

इतरांना तुमचा अभिमान असतो पण क्षमस्व, मला माझाच अभिमान आहे कारण मी तुमचा एक जबरदस्त चाहता आहे.

© मिलिंद सहस्रबुद्धे
११/१०/२०१९

ता. क. -  हा फोटो टाकला कारण अमिताबच्चन म्हणलं ना की साला हाच डोळ्यासमोर येतो 🙏..

Comments

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि