Skip to main content

"ती" चा प्रवास

"ती" चा प्रवास

स्वतःच्या स्वतःला जन्म देते आणि पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेते. तर इतरांना जन्म देण्याची क्षमता असलेली ऐकमेव अशी ही स्री. जन्मापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास वेगवेगळ्या वळणांवर नवीन नवीन जन्म घेतो. जसा साप कात टाकून परत परत अमर राहतो अगदी तसाच. जन्माला येते मूल, मुलगी म्हणून इथून सुरू झालेला प्रवास बहीण, मैत्रीण पुढे बायको आणि मग आई-आजी अश्या नात्यात नव्याने जन्म घेतच जाते.  हा "ती"चा प्रवास प्रेम, संयम, काळजी अशा विविध डब्यांमधून होत असतो.  तीच्या या प्रवासाच्या रेल्वेला जसे अनेक डबे जोडलेले असतात तसे हे डबे आणि मग त्यात तिची विविध माणसं, नाती म्हणून जोडली जातात.
 निसर्ग तीला सोशिकता आणि जीवनातील जैविक आणि सामाजिक सत्य वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच उलगडून दाखवतो. तिथून मग पुढची प्रत्येक वर्ष तिला हाच निसर्ग प्रगल्भ बनत जातो. हा असा एकमेव प्रवास आहे ज्यात "ती"च स्वतः ड्राइवर असते, पॅसेंजर असते सिग्नल सुद्धा "ती"च पाडते आणि डेस्टिनेशन्स् सुद्धा "ती"च ठरवते. तीची ही ताकद विलक्षण आहे आणि आपण त्याचा अनुभव विविध क्षेत्रात विविध वेळी घेतच असतो.

कित्येक शतकांपासून तीचा हा प्रवास चालूच आहे. पुरुष प्रजाती ही तिथंच थिजलेलीच आहे. ही प्रजाती जशी होती तशीच आहे, तिथेच आहे, घुटमळत. वर्चस्ववादी अहंकारी आणि संकुचित. याच्या अगदी उलट स्त्री प्रजाती, "ती"ने खूप मोठा अवघड प्रवास केला आहे, करत आहे आणि अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तीने या शतकांच्या प्रवासात खूप आमूलाग्र बदल घडवलाय स्वतःमध्ये. "She has crossed Thousands of Miles ahead of Him".  तीच्यातील सोशिकता, कणखरपणा, जिद्द,धाडस, चिकाटी आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं कसब आणि क्षमता तिला इथवर घेऊन आली आहे.  पुढील शतक हे नक्की स्त्री वर्चस्ववादी असेल हयात माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

या यशस्वी प्रवासात तिला कोणाचीही साथ नव्हती स्त्रियांनी स्वतः पुढाकार घेऊन वेळोवेळी विविध क्षेत्रात आणि विविध प्रसंगात पुरुषी वर्चस्ववाद मोडून काढला आहे. आज मुलगी जन्माला येणे किंवा मुलगी असणं हे कौतुकाची आनंदाची पोचपावती ठरत आहे

इतका दुर्गम पण यशस्वी प्रवास करून सुद्धा अजूनही आपण रोज वर्तमानपत्रात एक नवीन निर्भया जन्माला आलेली बघतोय. ती चं शील हरण्याची भीती अजूनही संपली नाही आहे उलट ती अजूनच वाढत आहे. आता रावण तर सोडाच पण मी मी म्हणणारे राम देखील लक्ष्मण रेषा ओलांडताना दिसतात. रस्त्यावरच्या प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन काही बदलत नाही. अजूनही वासना आणि सौंदर्य हयात फरक आम्हाला कळत नाही. अजूनही मैत्रीण, प्रेयसी आणि बायको या तिन्ही मधील बॉर्डरलाईन समजू शकलो नाही आपण. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तिचा टक्का वाढला आहे, ती चे महत्त्व वाढले आहे अवेअरनेस आला आहे  पण #me too सारखी प्रकरण जन्माला येतच आहेत.

 पाश्चात्य देशात ही समानतेची वागणूक नक्कीच दिसून येते याबाबतीत मात्र आपला देश त्यांना फॉलो करत नाही बाकी जमेल ते सगळं आम्ही फॉलो करतो. नॉर्वे-फिनलंड सारख्या देशात तर स्त्रिया कामावर बाहेर पडतात आणि पुरुष घर सांभाळतात. मनुष्य सोडून प्रत्येक बहुतांश प्रजातीत स्त्रीलाच महत्त्व दिले आहे सिंहीण हीच शिकार करते तर चिमणी, घार, कोकिळा असे पक्षी यांच्या नरांची नावच आपल्याला माहिती नसतात त्याप्रमाणे.

आज देशाच्या तीन सर्वोच्चपदी स्त्रिया ही पदे भूषवत आहेत. "सुमित्रा महाजन लोकसभा स्पीकर";  "सुषमा स्वराज विदेश मंत्रालय"; आणि "निर्मला सीतारमण संरक्षण मंत्री". काय योगायोग आहे बघा स्त्री मधला "स" ह्या तिघींच्याही नावात आहे. जणू 'सिं"हीणी च आहेत त्या. तरीही आपल्या देशातील संकुचित विचारसरणीचे लोक,  राजकीय पक्ष त्यांचा अभिमान न बाळगता खालच्या दर्जाचे राजकारणात धन्य मानत आहेत. जसं म्हणे राफेल प्रकरणात श्री नरेंद्र मोदींनी उत्तर द्यायला एका "स्त्री"ला पुढे केले अशा वल्गना करून ही लोक नक्कीच "ती"चा सतत अपमान करत आहेत. आणि आपली संकुचित मनोवृत्ती चव्हाट्यावर आणत आहेत.  एवढा मोठा निर्णय घेऊनही त्याचं खुल्या दिलाने कौतुक न करण्याची शूद्र पुरषी विचारसरणी अजूनही गेली नाही येथून.

सर्वात अजब विरोधाभास म्हणजे जो इतरांना, सर्व जगाला विचार स्वातंत्र्य, समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्यांचे डोस पाजतो,धडे देतो तो हा चौथा स्तंभ.  त्यात वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेल हयांच्या मुख्य संपादक पदावर एखादी स्त्री असल्याचं ऐकिवात नाही किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. पण ह्यांना कोण विचारणार, विचारण्याचा MIC ह्यांच्याच कडे आहे ना.

पी टी उषा पासून ते मेरी कोम पर्यंत; सिंधुताई सपकाळ पासून ते मंदाताई आमटे पर्यंत; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांपासून ते सुधा मूर्ती पर्यंत; डॉक्टर आनंदीबाई जोशी पासून ते सध्याच्या छोट्या गावातून येणाऱ्या डॉक्टर स्त्रीपर्यंत; देशाचा पहिला महिला पायलट पासून ते निर्मलाजी सीतारामन पर्यंत आणि इंदिरा गांधींपासून ते अँजेला मार्केल पर्यंत. अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर अग्रेसर आणि यशस्वी असलेल्या आणि आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी चहा देण्यापासून ते रात्री भाजी भाकरी प्रेमाने खाऊ घालणार्या सर्व स्त्रियांना महिला दिनाच्या सप्ताहात मानाचा मुजरा, सलाम आणि हो "धन्यवाद".

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे त्रिवार सत्य आहे कारण "ती" असते "ती"चा त्याग असतो म्हणूनच "तो" कर्तुत्व सिद्ध करतो. परंतु यशस्वी स्त्रीमागे पुरुष असतो असं क्वचितच पाहायला मिळतं कारण
"ती"चा प्रवास हा अजुनही 'ती"चाच आहे.




---© मिलिंद सहस्त्रबुद्धे


Comments

  1. खूप खूप छान व्यक्त केले आहे.
    मस्तच.
    अजून ही "ती"चा प्रवास हा अजुनही 'ती"चाच आहे, असे खरेच वाटते कधी कधी, खरंय .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"बंटी तेरा साबुन स्लो है क्या ?" इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याकडून आपण खूप चांगल्या गोष्टी, चांगले गुण घेतले. महत्त्वाची म्हणजे जागतिक बोली आणि वापरली जाणारी इंग्रजी भाषा घेतली‌. हया शिकलेल्या भाषेमुळेच आज आपल्या देशाची प्रगती इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. इंग्रजांचे कित्येक कायदे आणि नियम अजूनही जसेच्या तसे आपल्याकडे विविध खात्यांमध्ये चालू आहेत. त्या साहेबाचा सुट टायचा पोषाख आपण घेतला आणि इतरही बरेच काही. परंतु महत्त्वाची अशी सार्वजनिक स्वच्छता टापटीप आणि शिस्त मात्र घेतली नाही. सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेची शिस्त आपण घ्यायची विसरूनच गेलो किंवा कदाचित ती आपल्या रक्तात भिंनलीच नाही. उदाहरण द्यायचे झाले तर वरून अगदी सुट टाय चकाचक बूट घालून टापटीप असलेला माणूस, पण बूट आणि मोजे काढले तर घोट्याला झालेला खरूज उठून दिसावा अशी आपली अवस्था आहे. स्वच्छ शहराच्या विविध जाहिराती, रस्ते रंगवणे त्याच्यावर चित्र काढणे विविध पाट्या लावणे हे सर्व काही आपण  करत आहोत पण त्याच रस्त्यांवर त्याच्या मागच्या बाजूला गलिच्छ थुंकलेले, आणि घाण फेकलेल्या कचराकुंड्या नांदत आहेत. स्वच्छ

जिंदादिल...

जिंदादिल... टिव्हीवरील मुलाखतीत "तुमचे आवडते वक्ते किंवा नेते कोण, ज्यांच्याकडे पाहून तुम्ही भारावून गेलात?" असा प्रश्न जेव्हा प्रमोदजींना विचारला तेव्हा मला सहजच वाटलं की आता हे अटल बिहारी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी प्रथितयश नेतृत्वाचं नाव घेतील. पण माझा अंदाज साफ चुकला. प्रमोदजी म्हणाले "बापू काळदाते". कदाचित हे नाव त्यांच्या पिढीला विदर्भ -मराठवाडा किंवा महाराष्ट्रात नक्कीच माहिती असेल. मला फक्त एकच प्रश्न पडला की प्रमोद जी एवढे भारी तर मग बापू काळदाते काय माणूस असेल... प्रमोदजी महाजन, एक सतत हसत-खेळत सामोरं जाणारं आणि समोरून येणारं व्यक्तिमत्व. त्यांच्या हसण्यातच अशी काही जादू होती की बघितल्यावरच वाटायचं की हा माणूस समोरच्या कोणत्याही व्यक्तीला बाटलीत उतरवू शकतो. हो आणि ते तसंच होतं.  ती थोडी टिपिकल तलवार कट कम टिळक अशी मिक्स स्टाईलची मीशी, त्याच्याखाली मोठ्या अखिव हास्य दंतपंक्ती आणि बोलताना शर्करेची वाणी. खरंतर स्वतःचा कोणताही साखर कारखाना नसताना हा माणूस एवढा गोड बोलायचा की विचारू नका. ज्यांचे कारखाने आहेत त्यांची भाषा काय असते हे आपण नेहमी

*आपण सारे अर्जुन*

*आपण सारे अर्जुन* © मिलिंद सहस्रबुद्धे                   गुरुवारी रामनवमी झाली होती आणि शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून बहुतांश घरात लगबग सुरू होती. नऊच्या रामायणाची नाही तर नऊ वाजता देशाचे पंतप्रधान काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहेत आणि देशाच्या जनतेशी व्हिडिओकॉल द्वारे संवाद साधणार आहेत त्याची. प्रत्येक जण वाट बघत होता नऊ वाजण्याची आणि एकदाचे नऊ वाजले.  प्रत्येक न्युज चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ सुरू झाला. नेहमीप्रमाणे मोदींनी त्यांच्या शैलीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर भाष्य तर केलेच. खरंतर ते  बोलत असताना प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत होता की मोदी घोषणा काय करणार. भारतातल्या सवासौ करोड जनतेला आता मोदी जेव्हा जेव्हा टीव्हीवरून बोलतात तेव्हा काहीतरी मोठी घोषणा करणार असं नक्की माहिती असते. आमच्या ह्या भाऊ चा धक्का आज काय दे धक्का देणार ह्याकडे सगळ्यांचं जीव मुठीत घेऊन लक्ष होतं. तसं पाहायला गेलं तर आदल्या दिवशी जेव्हा मोदींनी त्यांच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवरुन सांगितलं होतं की मी उद्या सकाळी नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. तेव्हापासूनच तर्क-वितर्कांचे घोडे वि